महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी राजकीय

राज्य सरकार हे कुरघोडी करणारे सरकार – अंबादास दानवे

नेशन न्यूज मराठी टीम.

संभाजीनगर / प्रतिनिधी – देशभर फुटीरवादाचे राजकारण सुरूच आहे, आमदार, खासदार ,स्थानिक नेते पक्षांतर करतात. महाराष्ट्र देखील ह्यात मागे नाही. सध्या राज्य सरकार ज्या पद्धतीने राजकारण करत आहेत त्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ह्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले कि, राज्य सरकार हे कुरघोडी करणारे सरकार आहे. उद्धव साहेबांनी म्हटल्याप्रमाणे एक फुल दो हाफ असे सरकार आहे.

संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे दंगलीची चौकशी करायला काही हरकत नाही कारण संजय राऊत साहेब जे सांगतात ते सत्य आहे. शेवगाव, अकोला, संभाजीनगर, कोल्हापूर, संगमनेर या सर्व दंगली पूर्वनियोजित आहे यामध्ये कोणावर सरकारने कुठेही कारवाई केलेली नाही. असे दानवे म्हणाले.

देशाचं आर्थिक स्तोत्र मुंबई असल्यामुळे फक्त मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी नाही तर केंद्राची पण आहे. मुंबई फक्त महाराष्ट्राची राजधानी पुरती मर्यादित नसून देशाची आर्थिक राजधानी आहे . मुंबई काय एक महानगरपालिकेपुरते मर्यादित शहर नाही मुंबईमध्ये अनेक यंत्रणा काम करतात. आजही गल्ली -गल्ली मध्ये शिवसैनिकांना फोडण्याचा प्रयत्न होत आहे. आज कोणत्याही उपमुख्यमंत्र्याला वाटते की मी मुख्यमंत्री व्हावे त्यात काही वावगे नाही. असे दानवे यांचे म्हणणे आहे.
-.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »