महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
इतर

संकटाच्या काळात एकत्र येऊन काम करण्याची गरज- पालकमंत्री ना. बच्चू कडू

प्रतिनिधी.

अकोला – कोरोना चे संक्रमण हा अभूतपुर्ण अशा संकटाचा काळ आहे. हे संकट वैश्विक आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी संक्रमण रोखण्यासाठी प्रशासन जितके महत्त्वपूर्ण आहे तितकेच वैद्यकीय उपचार करणारे डॉक्टर्सही महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या संकटकाळात आपण सारे एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे केले. येथील इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या सभागृहात आज पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी सर्व सभासदांना संबोधित केले.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण तसेच आयएमए चे पदाधिकारी उपस्थित होते.
ना. कडू याप्रसंगी म्हणाले की, वैद्यकीय उपचार हा या संकटाला थोपवण्यातला महत्त्वाचा भाग आहे. ते काम डॉक्टरच करु शकतात. प्रशासन आणि शासकीय आरोग्य यंत्रणा ही हे संकट थोपविण्यासाठी सर्वात पुढे आहे. मात्र यात आपल्या सारख्या वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांची, त्यांच्या अनुभवाची जोड मिळाली की मग या संकटाचा मुकाबला अधिक जोमाने करता येईल,असे प्रतिपादन करुन त्यांनी डॉक्टर आणि प्रशासन यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे आवाहन केले. यावेळी आयएमएचे अध्यक्ष डॉ. कमलेश लढ्ढा, डॉ. अनूप कोठारी, डॉ. अमोल केळकर, डॉ. पराग डोईफोडे तसेच अन्य सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Posts
Translate »