महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
कृषी

विहित नियमांपेक्षा भरीव मदत शेतकरी बांधवांना मिळण्यासाठी शासन लवकरच घोषित करणार सकारात्मक निर्णय

प्रतिनिधी .

अलिबाग – रायगड निसर्ग या चक्रीवादळामुळे कोकणच्या चारही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरांच्या नुकसानी पासून तर शेतीचे, नारळाच्या, सुपारीच्या, आंब्याच्या, फणसाच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र शेतकऱ्यांनी धीर धरावा, विहित नियमांपेक्षा भरीव मदत शेतकरी बांधवांना कशी देता येईल यासंदर्भात शासन लवकरच सकारात्मक निर्णय घोषित करणार असल्याचे प्रतिपादन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी  येथे केले.
निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा दिवसभर पाहणी दौरा केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, जिल्हा कृषी अधीक्षक पांडूरंग शेळके, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर आदि उपस्थित होते,
उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना देताना कृषी मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, नुकसानीची सविस्तर आकडेवारी पंचनाम्यासह लवकरात लवकर सादर करण्यात यावी. जवळपास 25 ते 75 वर्षापूर्वीची सुपारी, आंब्याची झाडे, फळबागा नष्ट झाल्या असून पुढची काही वर्षे हीच झाडे शेतकरी बांधवांना उत्पादन देणार होते. आता नवीन रोपे लावून फळबाग उभ्या केल्या जाणार असल्या तरी साधारण पाच ते सात वर्षानंतरच शेतकरी बांधवांना त्यातून उत्पादन मिळू शकणार आहे. म्हणूनच या सर्व गोष्टींची जाणीव ठेवून अधिकाऱ्यांनी पंचनामे करावेत. पंचनामे करताना त्या शेतकऱ्याचे किती क्षेत्रामध्ये नुकसान झाले आहे, त्याच्या फळझाडांची संख्या किती होती, या नोंदींशिवाय त्याच्या फळझाडांच्या वयाचीही नोंद पंचनाम्यात करावी.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार हा पाहणी दौरा होत असून झालेल्या नुकसानीचा अहवाल सादर केल्यानंतर यापूर्वी जे काही विहित नियम आहेत त्या विहित नियमांच्या पेक्षा जास्त मदत शेतकरी बांधवांना मिळाली पाहिजे, याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासमवेत सविस्तर चर्चा झालेली आहे आणि निश्चितपणे भरीव मदत शेतकरी बांधवांना कशी देता येईल यासंदर्भात शासनाकडून लवकरच सकारात्मक निर्णय घोषित होईल, असे सांगून ते पुढे म्हणाले, नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांची जी काही फळझाडे आहेत ती फळझाडे बाजूला करणे, यासाठी शेतकरी बांधवांना मोठा खर्च येणार आहे आणि म्हणून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबाला रोजगार द्यावा. जेणेकरुन त्या फळबागांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई, इकडे तिकडे पडलेली झाडे बाजूला करणे हे एक मोठं काम आहे ते लवकरात लवकर पूर्ण होईल.
ज्या फळांची झाडे अर्धवट तुटलेली आहेत त्यांचे पुर्नजीवन करता येईल का? याची चाचपणी कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांच्या मदतीने केली जाणार असून जिथे पूर्णपणे झाडे नाहीशी झालेली आहेत त्या ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून, विद्यापीठाकडे उपलब्ध असलेल्या रोपांच्या सहाय्याने आणि कृषी विभागाच्या फळबाग लागवड योजनांच्या माध्यमातून त्या बागा पुन्हा उभ्या करण्याचे काम कृषी विभागाच्या माध्यमातून होणे अपेक्षित आहे, असेही ते शेवटी म्हणाले.

Related Posts
Translate »