महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

पिकांच्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी सरकारला आली उशीरा जाग, हे वराती मागून घोडे नेमके कशासाठी?

प्रतिनिधी.

औरंगाबाद – मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे २५ लाख ४६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ३६ लाख शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला आहे. अशा परिस्थितीत नैसर्गिक आपत्ती सोबत दोन हात करीत असलेला शेतकरी सरकारी मदतीकडे आस लावून बसला आहे. मात्र जून ते सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये झालेले पिकांचे नुकसान बघण्यासाठी केंद्र सरकारला डिसेंबर महिन्याच्या अखेरीस जाग आली आहे. शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले पीक काढून टाकले आहेत तसेच पुढील पेरणीसाठी मशागतीचे काम सुरू केले आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय पथक नेमकं कशाची पाहणी करण्याकरिता आले आहे. हे वराती मागून घोडे नेमके कशासाठी? शेतात पिकं उभी असताना झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक का आले नाही? राज्यातील खासदारांनी केंद्राकडे यासंदर्भात पाठपुरावा का केला नाही? मोठ्या उद्योगांच्या संदर्भात मध्यस्तीने मार्ग काढणारे आणि केंद्रात कृषिमंत्री राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्राकडे पाठपुरावा करून वेळेत पाहणी पथक का बोलावले नाही? राज्यातील भाजपचे नेत्यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून वेळेत पाहणी पथक का बोलावले नाही? केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो कुणालाही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे नाहीयेत. केवळ त्यांच्या प्रश्नावर राजकारण करून मतांचा जोगवा मागण्याचे काम हे सत्ताधारी पक्ष करीत आहेत. आधीच कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांना आत्महत्येकडे लोटण्याचं पाप सरकार करीत आहे. आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या दोन्ही सरकारांचा निषेध करीत असून केंद्र सरकारने तातडीने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे वाटप करावे अशी मागणी करीत आहोत.

Related Posts
Translate »