महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image चर्चेची बातमी ठाणे

संविधानाने दिलेले स्वातंत्र्य हिरावून घेतले जातेय – तुषार गांधी

नेशन न्यूज मराठी टीम.

https://youtu.be/QZCerfRlhiw

कल्याण – देशामध्ये असणाऱ्या विविध समस्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठीच सरकारकडून ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा केला जात असून संविधानाने आपल्याला दिलेले स्वातंत्र्य हिरावून घेतले जात असल्याची परखड टिका महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी कल्याणात केली. कल्याणातील अग्रामनांकित बिर्ला महाविद्यालय आणि गांधी अध्ययन केंद्रातर्फे आयोजित राष्ट्रीय युवा शिबिरात बोलताना तुषार गांधी यांनी हे मत व्यक्त केले.

गेल्या 75 वर्षांत आपण महात्मा गांधींच्या स्वप्नातील नव्हे तर दुस्वप्नातील भारत असून त्यांच्या स्वप्नातील भारत बनवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. 75 वर्षे उलटूनही नागरिकांमध्ये एकता नाही तर विषमता आहे, विवाद आहेत. लोकांमध्ये स्वातंत्र्याविषयी जी तळमळ आणि जाणीव असली ती आपल्याला अजिबात दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच 75 वर्षांनंतरही पूर्वीच्याच समस्या कायम असून त्यांनी आधीपेक्षा अक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे. संविधानाने दिलेले स्वातंत्र्य आपल्याकडून हिरावून घेतले जात असून समाजामध्ये विषमता एवढी जास्त प्रभावशाली आणि प्रचंड स्वरूपात असून बेरोजगारी, शिक्षणाचा घसरलेला स्तर आदी मूलभूत समस्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवसारखे उपक्रम सतत राबविले जात असल्याची टिका तुषार गांधी यांनी यावेळी केली.

तर कोविड काळात पहिल्या लॉकडाऊन दरम्यान असुरक्षित वातावरण निर्माण झाल्याने लाखो कामगारांनी शहरांकडून गावाकडे स्थलांतर केले. तेच लोकं आज परिस्थिती सामान्य होऊ लागल्यावर गावात रोजगार नसल्याने पुन्हा एकदा शहराकडे वळत आहेत. आजच्या घडीला ज्यांच्याकडे रोजगार आहेत त्यांच्याकडे स्वतःच घर नाहीये आणि ज्यांच्याकडे स्वतःचे घर आहे त्यांच्याकडे रोजगार नाहीये, ही 75 वर्षातील स्वातंत्र्याची सर्वात मोठी विटंबना असल्याचा घणाघातही गांधी यांनी यावेळी केला.

तर सध्याच्या शिक्षण व्यवस्थेने केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर शिक्षकांनाही गुलाम करून ठेवले आहे. एमबीबीएस, इंजिनिअरिंग करूनही जॉब नसेल आणि आपले पंतप्रधान त्यांना पकोडे तळायचे सल्ले देत असतील तर मग माझ्या वयाची 15 -17 वर्षे मी शिक्षण करण्यात का वाया घालवू असा परखड सवालही त्यांनी यावेळी उपस्थित करत ब्रिटिशांनी लागू केलेली शिक्षण पद्धती मुळापासून बदलण्याची गरज व्यक्त केली.

यावेळी बी.के. बिर्ला फाउंडेशनचे संचालक प्रो.सुरेश ऋतुपर्ण, बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेश चंद्र, गांधी स्टडी सेंटर डॉ. अर्चना सिंह, बिर्ला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पाटील, वरिष्ठ उपप्राचार्य सपना समेळ, हिंदी भाषा विभागाचे एस.एस. पांडेय आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान बिर्ला महाविद्यालयात पुढील 5 दिवस चालणाऱ्या या राष्ट्रीय युवा शिबिरात महाराष्ट्रासह देशभरातील 14 राज्यांचे विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले आहेत. ज्यामध्ये पूर्वोत्तरच्या मणीपुर, आसाममधील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »