महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महत्वाच्या बातम्या राजकीय

धर्म आणि जातीच्या आड आमच्या हक्काची लढाई थांबता कामा नये-बच्चू कडू

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

कल्याण/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळेच वळण आले आहे. कारण आपल्या पक्षाच्या प्रचाराबरोबर राजकीय नेते विरोधी पक्षावर वारंवार टीका आणि आरोप लावण्यात मग्न झाले आहे. भिवंडी लोकसभेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले जिजाऊ संघटनेचे संस्थापक निलेश सांबरे हे भिवंडीतून अपक्ष लढत आहे. त्यांना प्रहारचे बच्चू कडू यांनीही पाठिंबा दिला. निलेश सांबारे यांच्या प्रचारार्थ कल्याणात सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत बच्चू कडू यांची मुख्य उपस्थिती होती. यावेळी सभेत बच्चू कडू यांनी काँग्रेस-भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडले.

आमदार बच्चू कडू यांनी भाजपवर निशाणा साधला ते म्हणाले “34 हजार एकरावर मुंबई शहर वासलेले आहे. पण मुंबईमधील सहा हजार एकर जमीन सहा लोकांच्या नावावर आहे. या जमिनीला सील का लावला जात नाही. जागेच्या कोंडीमुळे मुंबईच्या झोपडपट्टीत राहणारा माणूस साधा पायही पसरू शकत नाही. त्याला राहायला घर नाही. हा निवारा कुणी हिसकावला?” असा सवाल त्यांनी केला. पुढे बोलताना ते म्हणाले की “जर सहा हजार एकर जमीन सहा लोकांजवळ राहत असेल आणि कष्ट करणाऱ्या लोकांना घरे मिळत नसतील तर मग हे प्रश्न लोकांनी सत्ताधाऱ्यांना विचारायला हवे.

“धर्म आणि जातीच्या आड घेऊन आमच्या हक्काची लढाई थांबता कामा नये. त्या सामान्य माणसाची लढाई अधिक मजबुतीने उभी राहिले पाहिजे असे बच्चू कडू यांनी कल्याण सभेत सांगितले. काँग्रेस आणि भाजपा हे दोघे धर्माचे नातेगोते जुळवतात. पण या भारतात कन्याकुमारीपासून ते काश्मीर पर्यंत ज्या हत्या झाल्या त्या शेतकऱ्याच्या आणि मजुराच्या झाल्या. बेरोजगारांनी आत्महत्या केल्या. मारणारा हिंदू आहे का मुसलमान याची शोधाशोध घेण्यापेक्षा मरतोय कोण हे महत्त्वाचे आहे. कुठल्यातरी विशिष्ट धर्मातल्या माणूस दंगलीत मेला तर त्याचा उहापोह होतो पण साडेतीन लाख शेतकरी आज आत्महत्या करून मरत आहे. याची साधी बातमी होत नाही याचे मला दुःख आहे.” अशी जहरी टीका बच्चू कडू यांनी सरकार वर केली.

भिवंडी येथील महाविकास आघाडीच्या सभेत अरविंद केजरीवाल यांनी चार तारखेनंतर भाजप जिंकले तर सुप्रिया सुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे त्याचबरोबर आदित्य ठाकरे जेलमध्ये जातील असं वक्तव्य करत भाजपाला लक्ष केलं होतं. याबाबत बोलताना आमदार बच्चू कडू यांनी अशा पद्धतीचे टोकाचे राजकारण सुरू आहे जो सोबत नाही आला, तर तो बाहेर निघेल असं होऊ नये. असं आदिलशाहीच्या काळात होत होतं. मोघलांचा फर्मान पाळला नाही तर लोकांना सरळ जेरबंद केले जायचे. मी वारंवार सांगतोय ईडी ची चौकशी फक्त एकाच पार्टीवर होत नाही. एकाच पार्टीचे लोक ईडी मध्ये का आत जात नाहीत? हा माझा साधा प्रश्न आहे. कायदा सगळ्यांना समान असला पाहिजे. 5000 लाख चोरून पण पार्टीतला आहे म्हणून तो चोर होत नसेल आणि पाच रुपये चोरले म्हणून त्याला आत टाकण्याची व्यवस्था केली जाते. जुलूमशाही आहे लोकशाही संपायची नसेल तर सगळ्यांनी विचार केला पाहिजे असे आवाहन बच्चू कडू यांनी मतदारांना केले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »