महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
पोलिस टाइम्स महत्वाच्या बातम्या

चाकूने भोसकून पत्नीची हत्या करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने सुणावली जन्मठेपेची शिक्षा

बुलढाणा/प्रतिनिधी – पती पत्नीच्या सुखी संसारात संशय नावाचे फूल उमलले कि नात्यात अनेक मोठी वादळे येतात. ही वादळे इतकी भयानक असतात की आवडत्या व्यक्तीला मारताना सुद्धा हात कापत नाहीत. जालन्यात राहणाऱ्या गजानन जाधव याचे पूर्ण कुटुंबं एका क्षणात उध्वस्त झाले. कारण होते ते म्हणजे त्यांनी पत्नीच्या चारित्र्यावर घेतलेला संशय. या संशयातून त्याने आपल्या पत्नीची अमानुषपणे हत्या केली.

2011 मध्ये आरोपी गजानन विश्वनाथ जाधव (रा.जालना) याच्यासोबत मृत महिलेचे लग्न झाले होते. लग्नानंतर त्यांना तीन मुली झाल्या. परंतु आरोपी गजानन हा नेहमी आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत. त्याचबरोबर तो पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ सुद्धा करत होता. पीडित महिलेचे वडील सुरेश तायडे हे नेहमी आपली मुलगी व जावई गजानन यांस समज देत. पण पतीच्या त्रासाला कंटाळून अखेर महिलेने आपल्या मुलींसह पळ काढला. ती एक ते दीड महिन्यापूर्वी आपल्या मुलींसह माहेरी आली. पण काही दिवसातच तिचा पती आरोपी गजानन हा जालन्यावरून बुलढाण्यात आपल्या सासरी आला. रात्री जेवण करून फिर्यादीच्या घरी अर्थात सासरी मुक्कामी थांबला होता.

9 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास महिलेचे वडील सुरेश तायडे व त्यांची पत्नी कामानिमित्त बाहेर गेले होते. महिलेच्या दोन्ही मुली घराबाहेर खेळत होत्या. महिला घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत आरोपी गजानन जाधव याने तिच्यावर दोन चाकूंच्या मदतीने आठ वेळा वार केले. या दरम्यान महिलेचा जागीच मृत्यू झाला. यानंतर घाबरलेल्या आरोपीने आपल्या दोन्ही मुलींसह संगम तलावामध्ये उडी घेत जीव देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना बुडण्यापासून नागरिकांनी वाचवले. पोलिसांनी आरोपी गजानन जाधव याला पत्नीचा खून केल्याच्या आरोपाखाली बेड्या ठोकल्या. जिल्हा सत्र न्यायालय बुलढाणा येथे आरोपीविरुद्ध खटला सुरू झाला. जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी याला आजीवन जन्मठेपेची शिक्षा आणि 16 हजार पाचशे रुपयांचा दंड ठोकल्याची माहिती जिल्हा न्यायालयातील सरकारी वकील व्ही. एल. भटकर यांनी दिली आहे.

 

 

Related Posts
Translate »