महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे ताज्या घडामोडी

भव्य ग्रंथ दिंडीने ठाणे ग्रंथोत्सवास कल्याणमध्ये मोठ्या उत्साहात सुरुवात

नेशन न्यूज मराठी टीम.

ठाणे/प्रतिनिधी – उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, ठाणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ठाणे ग्रंथोत्सवास आज ग्रंथ दिंडीने मोठ्या उत्साहात आरंभ झाला.

कल्याण मधील अभिनव विद्या मंदिर शाळेच्या आनंदी गोपाळ सभागृहात आयोजित ग्रंथोत्सवाचे उद्घाटन साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष अरुण म्हात्रे, साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष अरुण म्हात्रे यांच्या उपस्थितीत झाले.यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील, ठाणे जिल्हा ग्रंथालय संघटनेचे अध्यक्ष चांगदेव काळे, उपाध्यक्ष श्रीधर घारपुरे, सरचिटणीस भिकू बारस्कर, मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोड, शशिकांत काकड, ज्येष्ठ साहित्यिक जनार्दन ओक आदी उपस्थित होते. आमदार विश्वनाथ भोईर यांनी ग्रंथोत्सवास भेट देऊन शुभेच्छा दिल्या. ग्रंथोत्सव निमित्त आयोजित ग्रंथ विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.

सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी म्हणाले की, ग्रंथालयाच्या संख्येबरोबरच त्यांची गुणवत्ता वाढायला हवी. मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती होताना ते वाचण्यासाठी वाचक वाढायला हवेत. ग्रंथालयामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. तरीही वाचन संस्कृती कमी का होत आहे, याची कारणमीमांसा करण्याची गरज आहे. प्रत्येक शाळा, महाविद्यालयात मराठी वाड्मय मंडळ स्थापन झाले पाहिजे, तिथे दरवर्षी वाचन स्पर्धा झाली पाहिजे. यासाठी समाजाची मानसिकता बदलली पाहिजे तरच येणाऱ्या पिढीला वाचनाची आवड निर्माण होईल.साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष कवी अरुण म्हात्रे म्हणाले की, कोरोनानंतर पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रंथोत्सव होत असल्याचा आनंद आहे.

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाचा, ग्रंथाचा प्रसार व्हायला हवे. सर्वांना पुस्तकाचा लाभ मिळायला हवे यासाठी ग्रंथालय काम करत आहेत. आजची पिढी पुस्तक कमी वाचते. पुस्तकांचा प्रभाव वाढविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे. मराठी वाचन वाढविण्याची शिक्षकांबरोबरच पालकांचीही जबाबदारी आहे. चांगल्या दर्जाची पुस्तकांची निर्मिती करायला हवी त्याच बरोबर ती लोकांपर्यंत पोचविण्यासाठी योजना करावी लागेल. यासाठी ग्रंथोत्सव उपक्रम महत्वाचा आहे. पुस्तकांसारखी गोष्ट आयुष्यात असणं मोठी गोष्ट आहे. पुढचे आयुष्य पुस्तकाशिवाय कठीण होणार आहे. ठाणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष चांगदेव काळे म्हणाले, साहित्य समृद्ध करण्यासाठी देशात सर्वात जास्त महामंडळे महाराष्ट्र राज्यात आहेत. राज्यात सगळ्यात जास्त ग्रंथालयाची संख्या आहे. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून राज्य शासन लोकांपर्यंत साहित्य पोचवत आहे. वाचन संस्कृती वाढविण्याचा हा उपक्रम आहे. प्रशांत पाटील म्हणाले की, कल्याण सारख्या ऐतिहासिक शहरात ग्रंथोत्सव होत आहे.

या सांस्कृतिक शहरात वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न आहेत. या ग्रंथोत्सव निमित्ताने आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ नागरिकांनी घ्यावा.कल्याणमधील ज्येष्ठ साहित्यिक जनार्दन ओक, श्रीराम साठे, चंद्रशेखर भारती, राजीव जोशी, जितेंद्र भामरे, योगेश जोशी, श्रीकांत पेटकर, भिकू बारस्कर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील यांनी प्रास्ताविकात ग्रंथोत्सव आयोजना मागील भूमिका सांगितली.यावेळी विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. नाट्य परिषदेचे कल्याण शाखेचे अध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी वासुदेवाचे रूप सादर केले. आराधना डान्स अकादमीच्या विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदना सादर केली.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »