महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image इतर ताज्या घडामोडी

शिक्षकांनी समाज व्यवस्थेला शिक्षित करावे : ॲड.प्रकाश आंबेडकर

नेशन न्यूज मराठी टीम.

अकोला / प्रतिनिधी – देशात जात व धर्माच्या नावावर अवास्तववादी राजकारण करण्यात येत आहे. त्यामुळे समाज व्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने शिक्षकांनी समाज व्यवस्थेला शिक्षित करावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी अकाेला जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेतर्फे आयाेजित सेवानिवृत्त शिक्षकांचा सपत्निक सत्कार व विद्यार्थ्यांचा गुणगाैरव पुरस्कार साेहळ्यात व्यक्त केले.

अकोला जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेतर्फे रविवारी स्थानिक प्रमिलाताई ओक सभागृहात पतसंस्थेची आमसभा आयोजित करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे उद्‍घाटन वंचितचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. विचारपीठावर वंचितच्या नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती हाेती. कार्यक्रमाला पतसंस्थेचे अध्यक्ष शशीकांत गावयकवाड यांच्यासह जि.प. अध्यक्षा संगिता अढाऊ, उपाध्यक्ष सुनील फाटकर, सभापती आम्रपाली खंडारे, रिजवाना परवीन, माया नाईक, याेगिता राेकडे, गट नेते ज्ञानेश्वर सुलताने, जिल्हाध्यक्ष प्रमाेद देंडवे, प्रदीप वानखडे, गाेपाल काेल्हे, बालमुकुंद भिरड, गोपाल राऊत, ॲड. संताेष रहाटे, विकास सदांशिव यांच्यासह पतसंस्थेचे उपाध्यक्ष प्रमाेद उपाध्ये, संचालक देवानंद माेरे, ज्ञानेश्वर टाेहरे, संजय इंगळे, माराेती वराेकार, अरविंद आगासे, विद्या सातव, रजनीश ठाकरे, नीलेश काळे, सारीका देशमुख, प्रमाेद काळपांडे आदी हाेते. सूत्रसंचालन शिक्षक किशाेर बळी यांनी केले. शिकवले किंवा न शिकवले तरी शिक्षकांना महिन्याला वेतन मिळते. चांगले शिकवणाऱ्या शिक्षकाचे काैतुकही हाेते. वयाच्या ५८ वर्षानंतर सेवानिवृत्त हाेते; त्यानंतर शाश्वत आयुष्य संपते आणि अशाश्वत व्यवस्थेला प्रारंभ हाेताे. अशा परिस्थितीत पतसंस्थेकडून मानवतावादी दृष्टीकाेण ठेवून मिळणारी मदत महत्त्वाची आहे, असे ॲड. आंबेडकर म्हणाले.

लाेकांच्या पाेटासाठीचे राजकारण बंद काॅंग्रेस सत्तेत आल्यानंतर मुस्लिम म्हणायचे कि इस्लाम खतरे में है. आता भाजप सत्तेत आल्यानंतर आता हिंदू खतरे में हैं, असे म्हटले जाते. कॉंग्रसने धर्म निरपेक्षच्या नावाने; तर भाजपने हिंदूच्या नावे सत्ता घेतली. धर्माच्या नावाने राजकारण सुरू झाले आणि लाेकांचे पाेटासाठी असलेले राजकारण बंद झाले, अशा शब्दात ॲड. आंबेडकर यांनी राजकारणावर भाष्य केले.

मतदारांमध्ये जागरूकता आवश्यक विविध साहित्याची मागणी व पुरवठा यात फरक आहे. तुटवडा निर्माण केल्यानंतर महागाई वाढते. तुटवडा कृत्रीम असताे. बाजार नियंत्रित करणे, त्यावर लक्ष ठेवणे हे सरकाराचे सर्वात माेठे काम आहे. आता हे नियंत्रण करायचे असेल तर मतदारांनी जागृत हाेणे महत्त्वाचे आहे. व्यापारी, कारखानदार निवडून आल्यास ताे आपलेच हित पाहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विचार करावा असेही ते म्हणाले.

नवीन व्यवस्थेशी जुळणे आवश्यक धर्म-जात आधारित जुनी व्यवस्था सध्या वैध नाही. तर नवी व्यवस्था आर्थिक-सामाजिक आधारावर असून या नवीन व्यवस्थेशी जुळणे आवश्यक आहे. तरच देशात शांतता नांदेल अन्यथा भारतात मणिपूर घडल्याशिवाय राहणार नाही असेही बाळासाहेब म्हणाले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »