महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे ताज्या घडामोडी

२७ गावांची कर आकारणी नवी मुंबई महापालिकेच्या धोरणाप्रमाणे करा – आमदार राजू पाटील

नेशन न्युज मराठी टीम.

कल्याण – नवी मुंबईतील काही गावांमध्ये महापालिकेतर्फे विशेष धोरण राबविण्यात येत असून त्याच गावठाण धोरणावर केडीएमसी प्रशासनाने 27 गावांमध्ये कर आकारणी करावी अशी मागणी कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. 27 गावांतील आणि पलावा टाऊनशीपमधील कर आकारणीबाबत आमदार पाटील यांनी केडीएमसी कर विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.
27 गावांत गावठाण भागात आधी 100 रुपये टॅक्स होता, त्याला आता 1 हजार रुपये येत असून केडीएमसीने इथल्या करामध्ये 3 प्रकारची विभागणी करण्याची आवश्यकता आमदार पाटील यांनी व्यक्त केली. तर 27 गावांत सरसकट कर आकारणी करण्याऐवजी गरजेपोटी मोठ्या केलेल्या घरांना जुन्या दराने कर आकारणी करण्याच्या पर्यायासारख्या 3 प्रकारची विभागणी अभ्यास करून लागू करा. ज्यामुळे ज्यांना शक्य होईल ते नक्कीच कर भरतील. नवी मुंबईत असणाऱ्या गावांना वेगळ्या प्रकारे कर लावलेले आहेत तशीच कर आकारणी 27 गावांत होण्याची मागणी केली असून केडीएमसी कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक स्तरावर ही सूचना मान्य केल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.

त्याचबरोबर पलावा टाऊनशीपला परवानगी देताना त्यामध्ये घरं घेणाऱ्याना मालमत्ता करात 66 सवलतीची तरतूद शासनाने केली असून तसा शासनाचा 2018 चा जीआर असल्याचे ते म्हणाले. परंतु वारंवार सांगूनही त्यावर काहीच कार्यवाही होत नाही. आमदार रविंद्र चव्हाण यांनीही हा मुद्दा मांडला होता. आतापर्यंत इथल्या 25 हजार रहिवाशांनी 15 कोटी रुपये कर भरला असून 66 टक्क्यांच्या विचार करता 9 ते 10 कोटी कराचा अधिकचा भरणा केडीएमसीला केला असून अद्यापही सुधारित बिलं देण्यात येत का नाहीत? अशी विचारणाही त्यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांकडे केली. त्यावर एमएमआरडीएकडून यासंदर्भात आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना नुकत्याच प्राप्त झाल्या असून लवकरच त्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन केडीएमसी अधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे येत्या महिन्याभरात हा मुद्दा निकाली निघून पलावातील रहिवाशांना मालमत्ता करात दिलासा मिळेल अशी आशाही आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी आमदार पाटील यांच्यासह मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, हर्षद पाटील यांच्यासह 27 गावांतील काही प्रतिष्ठित नागरिकही उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »