महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे मुख्य बातम्या

कल्याण-डोंबिवलीत एक हजार रिक्षांवर पोस्टर लावून दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठींबा

प्रतिनिधी.

कल्याण – दिल्लीत शेतकरी आंदोलन पेटले असताना देशातील अनेक राज्यात या शेतकरी आंदोलनाला पाठींबा मिळत आहे. आता या बाबत डोंबिवलीतील लाल बाबटा रिक्षा युनियनने या आंदोलनाला पाठींबा दर्शविण्या साठी एक हजार रिक्षावर “जय जवान जय किसान” असे पोस्टर लावून या शेतकरी आंदोलनाला पाठींबा दर्शविला आहे.
                शेतकरी आंदोलन पेटले असून पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश आदी राज्यातील शेतकरी केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत.या शेतकऱ्यांनी दिल्लीची नाकेबंदी करीत केंद्र सरकारला झुकवीत बोलणी करण्या साठी बाध्य केले आहे.अगोदर हे शेतकरी आंदोलन दडपण्या साठी केंद्र सरकारने आपली यंत्रणा राबविली होती.शेतकऱ्यांना बेरिकेट लावून राज्यांच्या सीमेवरच अडविण्यात आले होते.थंडी असताना या शेतकऱ्यावर थंड पाण्याचे फवारे मारण्यात आले होते.पण अशी परिस्थिती असताना शेतकरी आपल्या भूमीकेवर ठाम असल्याचे दिसून आल्याने आता केंद्र सरकार शेतकऱ्यांन बरोबर बोलणी करण्यास तयार झाले आहेत.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांन बरोबर चार फेऱ्या चर्चा केली असून अजूनही या बाबत तोडगा निघू शकलेला नाही.शेतकरी आपल्या भूमीकेवर ठाम असून शेतकरी केंद्र सरकारने आणलेली शेतकरी विधयेकातील तिन्ही विधायके मागे घेण्या साठी ठाम आहेत.या मुळे आठ दिवसा पासून सुरू असलेले हे आंदोलन अजूनही सुरू आहे.
             आता या आंदोलनाला देशभरातून पाठींबा मिळत असल्याचे दिसून येत असून आता डोबिवलीत लाल बावटा रिक्षा युनियन ही या शेतकरी आंदोलनाला पाठींबा दर्शविण्या साठी मैदानात उतरली आहे.या पूर्वी राज्य मंत्री मंडळात असलेले राज्य मंत्री असलेले बच्चू कडू यांनी  या शेतकरी आंदोलना बाबत तोडगा न निघाल्यास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांन सह दिल्लीला कूच करू म्हणून असे जाहीर केले होते.आता डोंबिवलीतील लाल बावटा रिक्षा युनियनने या आंदोलना पाठींबा दर्शविल्याणारे आता या आंदोलनाचे लोण महाराष्ट्रात पोहचल्याने चित्र दिसून लागले आणि इतर संघटना ही मैदानात उतरणार आहे कारण केंद्राचे धोरणे की उद्योगपती पूरक आहेत आणि सर्वसामान्यांचा भिकेला लावणारे आहेत त्यामुळे आता ये लोन कृषी क्षेत्रात आणू पाहत आहे त्याला विरोध म्हणून शेतकरी रस्तावर उतरला आहे  .

Related Posts
Translate »