महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image महाराष्ट्र

स्व.यशवंतराव चव्हाण उजनी पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन

सोलापूर/प्रतिनिधी – सांडपाण्याच्या नावाखाली  पालक मंत्री दत्तात्रय भरणे  यांच्या आडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उजनीचे ५ टीएमसी पाणी पळवून नेले आहे.याबद्दल जिल्ह्यातील एकाही आमदाराने विधिमंडळात आवाज उठवला नाही, ही सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीने लाजिरवाणी बाब आहे.त्यामुळे उजनीचे पाणी वाचवण्यासाठी आपल्याला न्यायालयीन लढा उभारावा लागेल असे मत स्व. यशवंतराव चव्हाण उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचे मुख्य निमंत्रक तथा शिवसेना नेते नागेश वनकळसे यांनी मांडले.
उजनीचे ५ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला पळविल्याच्या निषेधार्थ स्व. यशवंतराव चव्हाण उजनी पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने मोहोळ तालुक्यातील सीना नदीवरील आष्टे बंधारा येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी वनकळसे बोलत होते. पुढे बोलताना वनकळसे म्हणाले की, सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची राज्यात ओळख निर्माण झाली आहे. मात्र एकही कारखानदार या मुद्द्यावर तोंड उघडायला तयार नाहीत. केवळ जनतेच्या बरोबर आहोत असे सांगून स्वतःच्या पक्षनेतृत्वाच्या विरोधात ठाम भूमिका घेत नाहीत. त्यामुळेच आपल्या सर्वांना उजनीचे पाणी वाचवण्यासाठी परिणामांची पर्वा न करता संघर्षासाठी तयार रहावे लागणार आहे.
याबाबत आपली भूमिका मांडताना वनकळसे म्हणाले की विधायक व न्याय या गोष्टीसाठी संघर्ष करून प्राणांची आहुती देऊन हौतात्म्य पत्करण्यासाठी सोलापूरकर मागे हटत नाहीत. हा या जिल्ह्याचा जाज्वल्य इतिहास आहे. सध्या जिल्ह्याची जीवनदायिनी असलेली उजनी सततच्या अतिक्रमणामुळे आज संकटात सापडली आहे. अशा परिस्थितीत सर्वपक्षीय विधिमंडळ नेते केवळ सोलापूरकरांच्या बाजूने असल्याचे सांगत आहेत. प्रत्यक्षात मात्र विधिमंडळात या मुद्द्यावर आवाज उठवत नाहीत. त्यामुळेच उजनीतील पाणी वाचवण्यासाठी जातिभेदाच्या आणि पक्षाच्या चौकटी मोडून  स्व. यशवंतराव चव्हाण उजनी पाणी बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून प्राण पणाला लावून लढा देऊ.
याप्रसंगी यशवंतराव चव्हाण उजनी पाणी संघर्ष समितीचे अशोक भोसले, श्रीरंग लाळे, महेश पवार,बाळासाहेब वाघमोडे,दादासाहेब पवार,सिद्धराम म्हमाणे, समन्वयक विकास वाघमारे यांची भाषणे झाली.यावेळी जेष्ठ शेतकरी नेते शिवाजीराव चव्हाण,सौदागर साठे,केशव वाघचवरे, नानासाहेब सावंत, हर्षल देशमुख,अमर चव्हाण, गणेश लखदिवे,जनार्धन ताकमोगे, बालाजी ताकमोगे, सागर काळे, फंटू कोळेकर, विशाल काळे, तात्या निकम,महेश गावडे,संतोष वाघचवरे, योगेश गोवर्धनकर, दादा हंडोरे, औदुंबर आरेकर यासह मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधव उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »