महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

रस्ते बाधितांच्या पुनर्वसनासाठी मनसेचे केडीएमसी मुख्यालयात ठिय्या आंदोलन

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण-पत्री पूलाच्या रस्ते विकास कामात बाधित झालेल्यांचे पुनर्वसन करण्यात यावे या मागणीसाठी आज मनसेच्या वतीने कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आाले. या आंदोलनास सुरक्षा रक्षकांनी मज्जाव करण्यात आला मात्र आंदोलक काही हटण्यास तयार नव्हते. अतिरिक्त आयुक्तांच्या भेटीपश्चात आंदोलकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले आहे.

   कल्याण पत्री पूलाच्या कामात अनेकांची घरे तोडण्यात आली. या तोडण्यात आलेल्या रस्ते बाधितांचे महापालिकेच्या बीएसयूपी प्रकल्पात पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी बाधितांनी केली आहे. यासाठी बाधित महापालिका मुख्यालयात वारंवार फेऱ्या मारत आहे. त्यांना आयुक्त भेट देत नसल्याने त्यांचा प्रश्न मार्गी लागत नाही. या प्रकरणी मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी  बाधितांना घेऊन आज दुपारीत तीन वाजता मुख्यालय गाठले. बाधितांनी आयुक्तांना भेटण्याची मागणी केली. त्यावेळी आयुक्त त्यांच्या दालनात उपस्थित नव्हते. तेव्हा दुस:या मजल्याच्या व्हरांडय़ातच बाधितांनी ठिय्या आंदोलन सुरु केले.

त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांना मज्जाव केला. त्यांच्या हातातील फलक हिसकावून घेतले. तसेच गळयातील पक्षाचे मफलर काढण्या भाग पाडले. मात्र आंदोलक हटण्यास तयार नव्हते. आधी आयुक्तांना सांगा आम्हाला भेट द्या. मगच आम्ही याठिकाणीहून उठू अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. यावेळी एक ज्येष्ठ नागरीक राम पांडे यांचे घर रस्ते प्रकल्पात बाधित झाले आहे. त्यांना तर रडूच कोसळले. त्यावेळी सर्व आंदोलकांनी पांडे यांना काय मेल्यावर न्याय मिळणार आहे का असा संतप्त सवाल केला. या प्रकरणात मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पत्र दिले आहे. मात्र त्या पत्रचे साधे उत्तर देण्यास प्रशासनास वेळ नाही.

अखेरीस मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांच्या नेतृत्वाखाली बाधितांचे एक शिष्टमंडळ अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांची भेट घेतली. दिवाळी पूर्वी हा विषय सोडवावा अन्यथा आम्ही उग्र आंदोलन करु अशा इशारा प्रशासनास दिला आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »