महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी देश

वांशिक विविधतेच्या जनजागृतीसाठी राष्ट्रीय महिला आयोगाकडून चर्चासत्राचे आयोजन

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्ली – राष्ट्रीय महिला आयोगाने आज नवी दिल्लीत, पोलीस संशोधन आणि विकास विभाग,राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग आणि ईशान्य प्रदेशासाठीच्या विशेष पोलीस विभागासह, ‘वांशिक विविधतेविषयी जनजागृती’ या विषयावर एका विशेष चर्चासत्राचे आयोजन केले होते. भारतातील विविध संस्कृतींची माहिती देण्यासाठी तसेच, देशातील विविध प्रथा-परंपरांविषयी परस्पर सामंजस्य वाढवण्यासाठीच्या उपाययोजनांवर यावेळी चर्चा झाली.

परराष्ट्र व्यवहार आणि शिक्षण मंत्रालयाचे राज्यमंत्री, राजकुमार  रंजन सिंह या चर्चासत्राला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आजच्या या चर्चासत्राचा उद्देश, देशात राष्ट्रीय एकात्मतेची, एकतेची भावना निर्माण करणे हा असून अशा जनजागृती मोहिमेचा मुख्य हेतू असून, यामुळे आपल्या मनात एकमेकांविषयी आत्मियतेची भावना निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला.

आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या ध्येयवाक्यावर भर दिला. भारतातील विविध संस्कृतीचे आदानप्रदान आणि त्याविषयी जनजागृती मोहीम होणे ही काळाची गरज आहे. परस्पर सामंजस्य आणि विश्वास हाच भारताच्या सामर्थ्याचा पाया आहे, त्यामुळे देशातल्या कोणत्याही  कानाकोपऱ्यातील व्यक्तीला सांस्कृतिक दृष्ट्या एकत्वभावना वाटायला हवी, असे रेखा शर्मा म्हणाल्या. पोलिसांची देखील या बाबत जनजागृती होणे आवश्यक आहे, असे सांगत, आयोगाद्वारे पोलिसांसाठी राबवल्या जाणाऱ्या जनजागृतीपर उपक्रमांची त्यांनी माहिती दिली.

या चर्चासत्राचा उद्देश आपल्या देशाच्या विविधतेतील एकतेचा उत्सव साजरा करणे आणि देशातील लोकांमध्ये प्राचीन काळापासून असलेल्या भावनिक बंधांना अधिक दृढ करणे हा होता. समाजात, पहिल्या फळीत काम करणाऱ्या सर्वांना विविध वंश आणि संस्कृतीविषयी माहिती देणाऱ्या विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच दिल्लीत राहणाऱ्या विविध अल्पसंख्यक समुदायांच्या प्रतिनिधीना वांशिक भेदभावाचा सामना करावा लागल्यास, काय करता येईल यावर माहिती देण्यात आली.या विषयावर विविध स्तरातील, व्यापक मते मांडण्यासाठी, आयोगाने, माजी फुटबॉल कॅप्टन बाईचुंग भूटिया, प्रयोगशील, सुधारणावादी शिक्षणतज्ञ सोनम वांगचूक, पोलिस सह आयुक्त हिबू तमांग, इत्यादी मान्यवरांना आमंत्रित केले होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »