महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
देश लोकप्रिय बातम्या

रेल्वेमार्गाने होणारी अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी आरपीएफचे ऑपरेशन नार्कोस

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – रेल्वेमार्ग होणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी भारतीय रेल्वे  प्रामाणिक प्रयत्न करत आहे. रेल्वे मार्गाने होणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात  कारवाई करण्यासाठी आरपीएफने  “ऑपरेशन नार्कोस” ही केंद्रीत मोहीम हाती घेतली आहे. भारत सरकारने दिनांक 11.04.2019 च्या अधिसूचना क्रमांक 1403 च्या माध्यमातून  रेल्वे संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांना एनडीपीएस  कायद्यांतर्गत अटक, शोध आणि अंमली पदार्थ जप्त करण्यासाठी प्राधिकृत  केले आहे.

अंमली पदार्थ,मादक द्रव्य आणि मनावर परिणाम करणाऱ्या पदार्थांच्या  (एनडीपीएस ) अवैध व्यापारात तस्करांकडून वापरल्या जाणार्‍या देशभरातील अंमली पदार्थ  तस्करीमध्ये रेल्वेमार्गाचाही वापर केला  जातो. ‘पोलीस’ आणि ‘सार्वजनिक सुव्यवस्था’ हे भारतीय राज्यघटनेच्या सातव्या अनुसूची अंतर्गत राज्याचे विषय आहेत आणि त्यामुळे राज्य सरकारे त्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांच्या उदा. सरकारी रेल्वे पोलिस (जीआरपी )/जिल्हा पोलिस/अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (एनसीबी )/राज्य उत्पादन शुल्क इ. संस्थांच्या माध्यमातून अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासह रेल्वेची कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्ह्यांचा प्रतिबंध, शोध, नोंद  आणि तपास करण्यासाठी  जबाबदार आहेत.

2020,2021 आणि 2022 (नोव्हेंबर पर्यंत) या वर्षांमध्ये एनडीपीएस  कायद्यांतर्गत संबंधित कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून  (एलइए) 4556 गुन्हे  नोंदवण्यात आले  असून 2125 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे आणि भारतीय रेल्वे मार्गावर 66.53 कोटी (अंदाजे) रुपये  किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

अंमली पदार्थ तस्करीचे  क्षेत्र आणि मार्ग  सतत बदलत राहतात.त्यामुळे, नियमित विश्लेषणावर आधारित, असे असुरक्षित मार्ग  ओळखण्याचे काम सातत्याने सुरु आहे  आणि सर्व संबंधितांच्या  समन्वयाने अंमली पदार्थांची तस्करी नियंत्रित करण्यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत.

रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री  अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »