महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने रास्ता रोको

सोलापूर/अशोक कांबळे – स्थानिक स्वराज्य संस्थामधील धोक्यात आलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यात यावे यासाठी राज्य सरकारने त्वरित कार्यवाही करावी.यासाठी सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ येथे अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी काही काळासाठी सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

सर्वोच्च न्यायालयाने एका रिट पिटीशन मध्ये दिलेल्या निकालामुळे पंचायत राज संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. संपूर्ण राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती ,जिल्हा परिषद,नगरपंचायत नगरपालिका व महानगरपालिका मधील ओबीसींसाठी राखीव असलेल्या जवळपास ५६ हजार जागावर परिणाम होत आहे.त्यामुळे संपूर्ण राज्यात ओबीसींमध्ये असंतोष पसरला आहे.मंडल आयोगाच्या ७३ आणि ७४ व्या घटना दुरुस्तीने ओबीसींना विविध पातळीवर आरक्षण दिले आहे.त्यामुळे ओबीसींचे आरक्षण कायदेशीर असून त्याचे संरक्षण होणे गरजेचे आहे.सध्या उध्दभवलेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने त्वरीत कार्यवाही करून ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाचे रक्षण करावे असे निवेदनात म्हटले आहे.

या आंदोलनात अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर आण्णा लिंगे,समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष जयंत भंडारे,महाराष्ट्र सदस्य दिलीप भुजबळ,समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब खारे,जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब भंडारे,जिल्हा कार्याध्यक्ष अनिल अभंगराव,समता परिषदेचे सोलापूर शहर अध्यक्ष शशिकांत बापू कांबळे,मोहोळ तालुका अध्यक्ष अमोल माळी,ता.शहर अध्यक्ष लक्ष्मण माळी,तालुका उपाध्यक्ष रफिक आत्तार, तालुका कार्याध्यक्ष शिवाजी भानवसे, पंढरपूर तालुका अध्यक्ष चंद्रशेखर जाधव, तेलंगवाडीचे सरपंच पांडुरंग माळी, अवधूत माळी, अमोल ननवरे, पांडुरंग माळी, अतुल माळी, श्रीनिवास नामदे, पुंडलिक माळी, पांडुरंग येळवे, बजरंग शेंडेकर, सुरेश माळी, सुभाष ननवरे, पोपट वसेकर, बालाजी माळी, राजकुमार आढेगावकर, विठ्ठल कोळी आदी सहभागी झाले होते.यावेळी पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी चोख  बंदोबस्त ठेवला होता.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »