महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे ताज्या घडामोडी

येत्या पावसाळ्यापूर्वी रिंगरोडचे काम पूर्ण होणार – केडीएमसी आयुक्त

प्रतिनिधी.

कल्याण – कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने महत्वाचा प्रकल्प असणाऱ्या ‘रिंगरोड’चे काम येत्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल असा अंदाज केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी वर्तवला आहे. केडीएमसी आयुक्तांसह शहर अभियंता, एमएमआरडीए अधिकारी, नगररचना विभाग अधिकारी आदींनी रिंगरोडच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी हा अंदाज व्यक्त केला.

रिंगरोडच्या दुर्गाडी ते टिटवाळा या टप्पा क्रमांक 4 ते 7 ची पाहणी करण्यात आली. तसेच इथल्या जमिन भूसंपादनाच्या अडचणीही पालिका आयुक्तांनी जाणून घेतल्या. रिंगरोडची समाधानकारक प्रगती झालेली असून येणाऱ्या अडचणी सोडवण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. दुर्गाडी ते टिटवाळा मार्गदरम्यान आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडची अडचण असली तरी त्याला बायपास करून रिंगरोडची कनेक्टिव्हिटी तयार करण्यात आली आहे. येत्या एप्रिलपासून प्रत्येक टप्पा केडीएमसीच्या ताब्यात देण्याचे एमएमआरडीएचे नियोजन असून पावसाळ्यापर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याचा अंदाज असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
तर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील वडवली पुलाचे काम अत्यंत वेगाने सुरू असून 20 जानेवारीपर्यंत तर कोपर पूल 15 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. तसेच पत्रीपुलाला जोडणाऱ्या 90 फूटी जोडरस्त्याचे कामही वेगाने सुरू असून दुर्गाडी पूलाच्या 3 लेन पावसाळ्यापूर्वी ताब्यात देण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न असल्याचेही डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related Posts
Translate »