महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी राजकीय

नौटंकी करून वोट मिळणार नाही,रवी राणांचा बच्चू कडूंवर हल्लाबोल

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

अमरावती/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीचे राजकारण चांगलेच तापले आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ आज अमित शाहांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पण या सभेमुळे वेगळ्याच वादाला सुरुवात झाली आहे. या वादाला कारण आहे ते अमरावती मधील सायन्स कोर मैदान. राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादामुळे अमरावतीच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाली आहे. बच्चू कडू हे विनाकारण नौटंकी करून आपली राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे.

आमदार रवी राणा यांनी पत्रकरांशी संवाद साधला ते म्हणाले “अमरावतीमध्ये सांस्कृतिक भवनात शरद पवारांचा कार्यक्रम होता. ते सांस्कृतिक भवन मी आधीच बुक केलं होतं. मात्र, शरद पवार व उद्धव ठाकरे येत असल्याने माझे बुकिंग रद्द करण्यात आले. तसेच आम्ही परतवाडा येथे योगिंच्या सभेसाठी आम्ही बुक केलेले ग्राउंड राहुल गांधींच्या सुरक्षिततेचा विचार करून त्यांना सभेसाठी देण्यात आले. देशाच्या गृहमंत्र्यांचा कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सायन्स कोर मैदान योग्य असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने दिला होता. तुम्ही जनतेच्या दरबारात लढा, लोक अशी नौटंकी करून तुम्हाला वोट करणार नाही. जिल्हा परिषदेच्या मैदानासाठी सुद्धा आम्ही आठ दिवसा आधीच अर्ज दिलेला होता. मात्र, तुम्ही राजकीय वापर करून ते मैदान मिळवून घेतले” असा आरोप रवी राणांनी बच्चू कडू यांच्यावर केला.

रवी राणांनी बच्चू कडू आणि दिनेश बुब यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला होता. यावर रवी राणा म्हणाले “बच्चू कडू यांचे सोंग संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेले आहे. आंदोलन करून कुठेतरी मीडियात राहण्याचा बच्चू कडू यांचा नेहमी प्रयत्न असतो. ज्या थाली मध्ये खातो त्यात थाली मध्ये छेद पाडण्याचा धंदा बच्चू कडू करत आहेत.” असा आरोप रवी राणांनी बच्चू कडू यांना टोला लागवला. तसेच बच्चू कडू यांच्यासोबत लोकशाही मार्गाने कायदेशीर लढाई करण्यास मी तयार असल्याचे रवी राणा यांनी सांगितले.

Related Posts
Translate »