महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
कृषी चर्चेची बातमी

पाण्यासाठी शेतकऱ्यांचे अर्ध नग्न अवस्थेत ‘रस्ता रोको’ आंदोलन

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

अहमदनगर/प्रतिनिधी – कडक उन्हामुळे तापमानाचा पारा वाढल्याने जिवाची काहिली झाली आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात याचा सर्वात मोठा परिणाम झालेला दिसत आहे. अनेक जिल्ह्यात दुष्काळाची समस्या निर्माण झाल्यामुळे यात शेतकऱ्यांची फरफट होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे मुळा डावा कालव्यातून शेतीच्या आवर्तनासाठी पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटना तसेच शेतकरी आक्रमक झाले. यावेळी त्यांनी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रस्ता रोको आंदोलन केले. शेतीतील पिके जगण्यासाठी तसेच गोधन चारा वाचवण्यासाठी सरकारने ताबडतोब मुळा डावा कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडावे अशी मागणी शेतकरी संघटनांच्या वतीने करण्यात आली.

रस्ता रोको केल्यानंतर अचानक शेतकऱ्यांनी अर्ध नग्न होऊन आंदोलन सुरू केले. “पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं” अशा घोषणा आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांकडून करण्यात आल्या. शेतातील बोअरवेल तसेच पाण्याचे तळे आटल्यामुळे पिण्यासाठी सुद्धा पाणी नाही. लोकसभा निवडणुकीच्या आधी प्रशासनाला यासंबंधी वारंवार आवेदन करून देखील त्याची दाखल घेण्यात नाही आली. असे मत शेतकऱ्यांनी यावेळेस व्यक्त केले. रानातली पीकं पाण्याअभावी जळून गेल्यामुळे गुरांना घालण्यास चारा नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. यावेळी आंदोलयांकर्त्यांचा रोष पाहून नायब तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी आंदोलकांकडून निवेदन स्वीकारले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »