महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला मानण्याची देशात सुरुवात झाली आहे – नाना पाटोले

नेशन न्यूज मराठी टीम.

संभाजीनगर/प्रतिनिधी – गांधी परिवाराला बेघर करण्याची शिक्षा कर्नाटकाच्या जनतेने भाजपला दिली असल्याचे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली आहे. नाना पटोले हे जालनामार्गे विदर्भात जात असताना ते जालना येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

देशातली लोकशाही संपवण्याचे काम भाजप करत आहे. त्यामुळे हे बदलाचे वारे असून राहुल गांधींचे नेतृत्वावर शिक्कमोर्तब करण्याचं काम कर्नाटक मधून सुरु झाल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. तर अनपढ व्यवस्था देशातील सत्तेत बसलेली असून भाजप सत्तेसाठी काहीही करू शकते, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

भाजपाने धडा शिकला पाहिजे की सत्तेचा दुरुपयोग करुन जनता घाबरणार नाही नाना पटोले यांनी भाजपला टोला लगावला. मागच्या वर्षी सुद्वा आम्हाला काठावर बहुमत दिलं होतं. भाजपचा खरा चेहरा भ्रष्टाचारी भाजप हे जनतेच्या समोर आलं.लिंगायत समाजाच्या जोरावर निवडून आले आणि त्यांना वाळीत टाकण्याचे काम भाजपने केले. त्यामुळे त्यांना तिथल्या जनतेने वाळीत टाकले कर्नाटकात 124 च्या वर जागा सुशिक्षित मतदारांनी कॉंग्रेसला दिल्या आहेत याहूनही जास्त जागा येतील असे म्हणत भाजप वर पाटोळे यांनी निशाना साधला.

राहुल गांधीवर खोटा आरोप लावून त्यांच लोकसभेच सदस्यत्व रद्द करण्याचं पाप भाजपने केल त्यांना बेघर केलंराहुल गांधी यांच्या नेतृत्वाला मानण्याची देशात सुरुवात झाली आहे राहुल गांधीकडे आम्ही पंतप्रधान म्हणून पाहतोय, राहुल गांधी शिकलेले आहेत आताचे पंतप्रधान किती शिकले मला माहित नाही असेम्हंत पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकाही केली

जो कोणी भाजपाविरोधात ताकदीने लढायला तयार आहे त्यांना आम्ही सोबत घेऊ कॉंग्रेससाठी सत्ता दुय्यम विषय आहे, आधी देश आणि संविधान आहेभाजपसाठी सत्ता प्रथम आहे उद्या कॉंग्रेसच सरकार आल तर भ्रष्टाचार संपवायला वेळ लागणार नाही, कारण सर्व भ्रष्टाचारी भाजपमध्ये आहेत, पिंजऱ्यात अडकले आहेत असे टीकास्त्र नाना पटोले यांनी भाजप वर सोडले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »