महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image चर्चेची बातमी मुंबई

कँन्सर पिडीतांमध्ये आत्मविश्वास जागविणारे “संध्या” या पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई प्रतिनिधी – आदर्श आई, पत्नी आणि परिचारिका या भूमिका एकत्र पेलतांना संध्या पाडावे यांना कँन्सर सारख्या दुर्धर रोगाने गाठले.पण शेवटच्या श्वासापर्यंत त्या या रोगाचा धैर्याने सामना करीत राहिल्या.त्या आठवणी जागविणारे “संध्या” हे पुस्तक कँन्सर पिडीत रुग्णांमध्ये जगण्याची उमेद निर्माण करणारे ठरेल,असे उदगार ज्येष्ठ पत्रकार,प्रहारचे संपादक सुकृत खांडेकर यांनी येथे या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी काढले.
मुंबई राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे कार्यालयीन सचिव नितिन पाडावे यांच्या पत्नी परिचारिका सौ.संध्या यांचे नुकतेच कर्करोगाने निधन झाले.लोकसेवेतील कर्तव्याला जागतांना सौ.संध्या पाडावे यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या यशस्वी पार पाडल्या.या आठवणींचा धांडोळा घेणारे आणि असंख्य कँन्सर पिडीतांमध्ये आत्मविश्वास जागविणारे “संध्या” हे पुस्तक लिहिले त्याचा प्रकाशन सोहळा रविवारी घाटकोपर पूर्व येथील गुरुकृपा हॉटेल सभागृहात पत्रकार सुकृत खांडेकर यांच्या हस्ते पार पाडला.

कार्यक्रमाला ज्येष्ठ कथालेखक काशिनाथ माटल, राष्ट्रवादीच्या नगरसेविका राखी जाधव,डॉ.उज्वला बारापत्रे, डॉ.शुषमा सारुकटे, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, प्रकाशक हिंदुराव जाधव,आदी मान्यवर त्यावेळी उपस्थित होते.त्या वेळी बोलतांना पत्रकार सुकृत खांडेकर पुढे म्हणाले, पत्नीच्या मृत्यू नंतर तिच्या यातना नितीन पाडावे यांनी डोळ्यातून पाणी न काढता पुस्तक रुपाने लिहिल्या आहेत,त्या निश्चितच थक्क करणाऱ्या आहेत. पुस्तकातील आठवण जागविताना खांडेकर म्हणाले, संध्याला पती कडूनची सेवा न पाहावल्याने सतत वाईट वाटत असते व ते दुःख ती पतीकडे व्यक्त करते त्यावेळी पती म्हणतो हीच बाधा मला झाली असती तर तूही माझी अशीच सेवा केली असतीस ना? असे अनेक भावनोत्कंठ प्रसंग पुस्तकात चित्रित करण्यात आले आहेत,त्या मुळे हे पुस्तक सर्वांना आवडेल.
ज्येष्ठ कथा लेखक काशिनाथ माटल म्हणाले,मृत्यू दारात उभा राहिला असतांना, जगायचे कसे?याचा वस्तूपाठ देणारे हे पुस्तक आहे.मृत्यूचे भय आपण आताच कोरोना महामारीत अनुभवले आहे.नगरसेविका राखी जाधव म्हणाल्या,पती-पत्नीच्या निस्सीम प्रेमाने भारलेले हे पुस्तक व्हँलेटाइन डे साजरा करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालुन जाईल.
डॉ.श्रीमती उज्वला बारापात्रे, डॉ.सुषमा सारुकटे यांनी आपल्या भाषणात संध्या पाडावे यांच्या वैद्यकीय सेवेतील निरामयी आठवणी जीवंत केल्या.
पुस्तकाचे लेखक नितीन पाडावे म्हणाले,मी लिहिलेलं केवळ पुस्तक नसून ते वास्तव आहे. कमी पगार घेणाऱ्या पतीशी विवाह करुन यशस्वी संसार कसा करता येतो,हे या पुस्तकात पहायला मिळेल.या पुस्तकाचे आर्थिक उत्पन्न आपण कँन्सर पिडीतांच्या सहाय्यासाठी देणार आहोत,असेही नितीन पाडावे म्हणाले.

Translate »
×