महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

वंचित बहुजन आघाडीचा बारामती प्रांत कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा

नेशन न्यूज मराठी टीम.

बारामती / प्रतिनिधी – मणिपूर मध्ये घडलेल्या महिला अत्याचाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा पूर्वतर्फे बारामती प्रांत कार्यालयावरती निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी बोलताना जिल्हा अध्यक्ष राज कुमार म्हणाले अस्वस्थ मणिपूर आहे कि अस्वस्थ भारत आहे? मणिपूर धगधगतंय कि संपूर्ण भारत धगधगतोय? मणिपूर हादरलय कि संपूर्ण भारतीय समाजच हादरला आहे? विटंबना दोन स्त्रियांची झाली कि भारतातील संपूर्ण स्त्री जातीची झाली? विवस्त्र धिंड दोन स्त्रियांची निघाली, कि हजारो वर्षांचा इतिहास असणा-या भारतीय संस्कृतीची निघाली?

मणिपूर सारख्या सीमेवरील अतिसंवेदनशील राज्यात गेली अडीच ते तीन महिने दोन जातीमध्ये प्रचंड जीवघेणा संघर्ष सुरु आहे. उघडकीस आलेल्या दोन स्त्रियांच्या विटंबनेमुळे अगोदरच संवेदनशील असणारे भारतीय समाजमन पूर्णतः हादरुन गेलं आहे. त्यामुळं ही दोन स्त्रियांची विटंबना नसून जगासमोर भारताला नग्न करून भारताची इज्जत काढली अशा नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी असे मत राज कुमार यांनी व्यक्त केले.

भारतासारख्या देशांमध्ये स्त्रियांवरती अत्याचार केला जातो. याच्यासारखी निंदनीय गोष्ट कोणतीच नसून मणिपूर घटनेची दखल घेऊन त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागावी असे मत महिला जिल्हा अध्यक्षा सीमाताई भालेसाईन यांनी व्यक्त केले. मणिपूर येथे तीन महिन्यापासून संघर्ष चालू असून महिलांची नग्न धिंड काढून देखील प्रशासनाने केसेस केल्या नाहीत त्यामुळे तेथील पोलीस प्रशासनाला देखील जबाबदार धरून त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करावेत असे मत महासचिव मंगलदास निकाळजे यांनी व्यक्त केले. त्यांच्यासोबत या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते,

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »