महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image चर्चेची बातमी ठाणे

उल्हासनदी बचाव कृती समिती तर्फे निषेध होळी

कल्याण प्रतिनिधी-उल्हासनदी बचाव कृती समिती तर्फे रविवारी पाचवा मैल येथे निषेध होळी करण्यात आली.उल्हास नदीच्या प्रदुषणासाठी जवाबदार असणाऱ्या प्रदूषण कर्त्यांचा, निष्क्रिय अधिकाऱ्यांचा, मोठं मोठे नाले नदीत सोडलेल्या  त्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा, जलपर्णीस कारणीभूत ठरणाऱ्या घटकांच्या निर्मात्यांचा यावेळी निषेध करण्यात आला. तसेच नदी प्रदुषणाचे फोटो आणि नदीतील जलपर्णी देखील या होळीत लावण्यात आली होती.

वारंवार निवेदनं देऊन सुद्धा नदी स्वच्छते बाबतीत उदासीन असणारे सरकार आतातरी नदी साठी काही ठोस भूमिका घेऊन नदी स्वच्छतेचे मार्ग मोकळे करेल आणी भविष्यात पुढच्या पिढीसाठी उल्हासनदी स्वच्छ सुंदर मिळेल अशी आशा यावेळी उल्हासनदी बचाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. बाजूलाच असलेली वालधुनी जशी केमिकलच्या विळख्यात सापडली आहे तशी परिस्थिती या उल्हास नदीची होऊ नये म्हणून उल्हासनदी बचाव कृती समिती स्वतः प्रत्येक रविवारी वेगवेगळे उपक्रम, श्रमदान, जनजागृती अशी अनेक कामे अगदी स्थानिक पातळीवर जाऊन करत असते.

 संबंधित खात्याने लक्ष देत कायम स्वरूपी उपाययोजना करत नाही तोपर्यत अशी अनेक निषेधात्मक आंदोलने होत राहणार असल्याचे समितीच्यावतीने सांगण्यात आले. यामध्ये उल्हासनदी बचाव कृती समितीचे अश्विन भोईर, निकेत व्यवहारे, निकेश पावशे, प्रशांत शेंडगे, भूषण लोखंडे, सागर लोखंडे, अनिरुद्ध भालेराव, निखील अंबावणे, ऋषिकेश गायकवाड, सचिन शिंगे, महादेव बंदीचोडे व स्थानिक ग्रामस्थ सहभागी झाले होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »