महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी देश

भारतीय रेल्वेचे परिविक्षाधीन अधिकारी राष्ट्रपतींच्या भेटीला

नवी दिल्‍ली / प्रतिनिधी –  भारतीय रेल्वेच्या (2018 तुकडी) 255 परिविक्षाधीन अधिकाऱ्यांच्या  गटाने राष्ट्रपती भवनच्या सांस्कृतिक केंद्रात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. भारतीय रेल्वे हा केवळ भारतीय अर्थव्यवस्थेचाच नव्हे तर भारताच्या एकात्मतेचा आणि सामाजिक-सांस्कृतिक विविधतेचा कणा आहे, असे राष्ट्रपतींनी परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना संबोधित करताना सांगितले. रेल्वे व्यवस्थेचा  समृद्ध वारसा पुढे नेण्याची आणि भारतीय रेल्वेला जगातील सर्वोत्कृष्ट दर्जाची सेवा देणारी रेल्वे बनवण्यासाठी प्रयत्न करणे ही तुमच्यासारख्या तरुण अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे, यावर त्यांनी भर दिला.

तंत्रज्ञान हे आज सर्व क्षेत्रांना चालना देणारी  शक्ती आहे, असे  राष्ट्रपतींनी सांगितले. दररोज लाखो लोकांच्या गरजा आणि मागण्या पूर्ण करणाऱ्या आणि दर महिन्याला लाखो टन मालवाहतूक करणाऱ्या भारतीय रेल्वेसाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त  वापर करणे आवश्यक आहे, हे राष्ट्रपतींनी अधोरेखित केले. लोकस्नेही आणि पर्यावरणस्नेही  वाहतूक व्यवस्थेसाठी नवीन अॅप्लिकेशन्स आणि यंत्रणा  तयार करून देशाच्या तांत्रिक प्रगतीमध्ये नवे  मार्ग तयार करण्यासाठी  तरुण अधिकाऱ्यांनी हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले.

रेल्वेमधून  प्रवास करणारे लोक त्यांच्या प्रवासाच्या आठवणी सोबत घेऊन जातात, असे राष्ट्रपती म्हणाल्या. प्रवाशांचे पाहुण्यांप्रमाणे आदरातिथ्य करावे आणि त्यांना आवडेल अशी  सर्वोत्तम सेवा आणि कायम स्मरणात राहील अशी  अनुभूती द्यावी  , असे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले.प्रवाशांच्या सुरक्षिततेसंदर्भात  सर्व प्रकारची  खात्री करण्याची गरजही त्यांनी  अधोरेखित केली . रेल्वे सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देत  अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता -आधारित-अॅप्लिकेशन्ससह प्रभावी आणि निर्दोष प्रणाली तयार केल्या पाहिजेत, असे राष्ट्रपतींनी सांगितले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »