महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
थोडक्यात देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ नोव्हेंबरला अरुणाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश दौऱ्यावर

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 नोव्हेंबर 2022 रोजी अरुणाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशला भेट देतील. पंतप्रधान, सकाळी सुमारे 9:30 वाजता, इटानगर इथल्या डोनी पोलो विमानतळाचे उद्घाटन करतील आणि 600 मेगावॅटचे कामेंग जलविद्युत केन्द्र राष्ट्राला समर्पित करतील. त्यानंतर ते उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे पोहोचतील, तेथे दुपारी 2 वाजता ते ‘काशी तमिळ संगमम्’चे उद्‌घाटन करतील.

ईशान्येकडील दळणवळणाला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल टाकत, इटानगर येथे ‘डोनी पोलो विमानतळ या अरुणाचल प्रदेशातील पहिल्या हरितक्षेत्र विमानतळाचे पंतप्रधान उद्घाटन करतील. विमानतळाचे नाव अरुणाचल प्रदेशातील परंपरा आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचे निदर्शक आहे.  अरुणाचल प्रदेशातील सूर्य (‘डोनी’) आणि चंद्र (‘पोलो’) याचा प्राचीन स्वदेशी संदर्भही विमानतळाच्या नावातून दिसतो.

अरुणाचल प्रदेशातील हे पहिले हरितक्षेत्र  विमानतळ 640 कोटी रुपये खर्चून, 690 एकर क्षेत्रफळात विकसित केले गेले आहे. 2300 मीटरच्या धावपट्टीसह, विमानतळ कोणत्याही हवामानामध्‍ये   कामकाजासाठी योग्य असणार आहे. विमानतळ टर्मिनल ही एक आधुनिक इमारत असून, ऊर्जा कार्यक्षमता, अक्षय ऊर्जा आणि संसाधनांच्या पुनर्वापराला ती प्रोत्साहन देते.

इटानगरमध्ये  नवीन विमानतळ विकसित झाल्यामुळे या प्रदेशातील संपर्क  तर सुधारेलच पण व्यापार आणि पर्यटनाच्या वाढीलाही गती  मिळून  या क्षेत्राच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल.

या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान 600 मेगावॅटचे कामेंग जलविद्युत केंद्र  राष्ट्राला समर्पित करतील. अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यात 80 किलोमीटरपेक्षा जास्त परिसरात पसरलेला, 8450 कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च  करून विकसित केलेला  हा प्रकल्प अरुणाचल प्रदेशला वीज अधिशेष राज्य बनवेल, तसेच ग्रीड स्थैर्य आणि एकात्मिकता  दृष्टीने राष्ट्रीय ग्रीडसाठी लाभदायक ठरेल.  हरित ऊर्जेचा किंवा पर्यावरण पूरक ऊर्जेचा  अवलंब वाढविण्याच्या देशाच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेसाठी हा प्रकल्प मोठे योगदान देईल.

पंतप्रधानांच्या दूरदृष्टीतून  प्रेरित, ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या कल्पनेचा प्रचार हा सरकारच्या प्रमुख लक्ष्यीत  क्षेत्रांपैकी एक आहे.  याचे प्रतिबिंब असणारा  आणखी एक उपक्रम, ‘काशी तमिळ संगम’ हा महिनाभर चालणारा कार्यक्रम काशी (वाराणसी) येथे आयोजित केला जात आहे आणि त्याचे उद्घाटन 19 नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे , देशातील सर्वात महत्त्वाची  आणि प्राचीन  अध्ययन पीठ असलेल्या तामिळनाडू आणि काशी या दोन ठिकाणांमधले जुने दुवे पुन्हा शोधणे, पुष्टी करणे आणि त्याचा आनंद घेणे हा आहे. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट दोन प्रांतातील विद्वान, विद्यार्थी, तत्वज्ञ, व्यापारी, कारागीर, कलाकार इत्यादी सर्व स्तरातील लोकांना एकत्र येण्याची, त्यांचे ज्ञान, संस्कृती आणि सर्वोत्तम पद्धती सामायिक  करण्याची आणि एकमेकांच्या अनुभवातून  शिकण्याची संधी प्रदान करणे हा आहे. तामिळनाडूतील 2500 हून अधिक प्रतिनिधी काशीला भेट देणार आहेत. ते समान व्यापार, व्यवसाय आणि स्वारस्य असलेल्या स्थानिक लोकांशी संवाद साधण्यासाठी चर्चासत्रे, स्थलदर्शन  इत्यादींमध्ये सहभागी होतील. हातमाग, हस्तकला, ओडीओपी (एक जिल्हा एक उत्पादन ) उत्पादने, पुस्तके, माहितीपट, पाककृती, कला प्रकार, इतिहास, पर्यटन स्थळे इत्यादींचे महिनाभर चालणारे प्रदर्शनही काशीमध्ये भरवले जाणार आहे. भारतीय ज्ञान प्रणालीच्या संपत्तीला आधुनिक ज्ञान प्रणालींसोबत जोडण्यासंदर्भात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये जो  भर देण्यात आला आहे, त्या अनुरूप हा प्रयत्न आहे. आयआयटी मद्रास आणि बनारस हिंदू विद्यापीठ हा कार्यक्रम कार्यान्वित करणाऱ्या दोन संस्था आहेत.  

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »