महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी राजकीय

India vs भारत” वादावर प्रकाश आंबेडकरांचे खोचक ट्विट!

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई / प्रतिनिधी – “India vs भारत” वादावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले असून संविधानाच्या पहिल्या कलमाशी खेळून भाजप-आरएसएसने #IndiaAliance ला मुर्खात काढले असल्याची टीका त्यांनी केली आहे.

राष्ट्रपती यांनी पाठवलेल्या निमंत्रणावरून देशाच्या नावसंदर्भात नावाचं वाद सुरू झाल्याचे दिसून येत. निमंत्रणावर देशाचं नाव India ऐवजी भारत लिहिल्याने #IndiaAliance च्या नेत्यांनी विविध विधाने करून हे सर्व त्यांच्या आघाडीला घाबरून केले जात असल्याची टीका केली होती. या वादावर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मार्मिक भाष्य केले आहे.

ट्विट मध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणतात की, “संविधानाच्या पहिल्या कलमाशी खेळून भाजप-आरएसएसने #IndiaAliance ला मुर्खात काढले आहे.

घटनेच्या कलम 1 मध्ये असे नमूद केले आहे की India, म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ असेल. #INDIA आणि #BHARAT दोन्ही या कलमात येतात.

प्रथमतः India का वापरला गेला हे सांगण्याऐवजी ते भाजप-आरएसएसच्या हेतूवर हल्ला करत आहेत.

भाजप-आरएसएसला हेच हवे आहे आणि इथेच INDIA हरला आहे, कारण हा भाजप-आरएसएसचाच अजेंडा आहे. तो अजेंडा म्हणजे या प्रकारच्या परिस्थितींवर मात करण्यासाठी INDIA आघाडीत रणनीतीचा अभाव तसेच कल्पकता आणि ज्ञानाची दिवाळखोरी आहे हे मतदारांना दाखवणे.” असे ट्विट मध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »