महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे मुख्य बातम्या

संत निरंकारी मिशनच्या ‘वननेस वन’ परियोजने अंतर्गत कोपरखैरणे येथे ३२४ वृक्षांची लागवड

कल्याण/प्रतिनिधी – संत निरंकारी मिशनच्या ‘वननेस वन’ नागरी वृक्ष समूह परियोजने अंतर्गत कोपरखैरणे येथील पावणे ब्रिजजवळ ठाणे-बेलापूर हायवेलगत ९ ऑक्टोबर रोजी ३२४ वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यामध्ये जांभुळ, सिसम, वेळा, आवळा, वावळ आदि जातीच्या झाडांचा समावेश आहे. येत्या तीन वर्षांपर्यंत किंवा ही झाडे आत्मनिर्भर होईपर्यंत संत निरंकारी मिशनचे सेवादार त्यांचे संगोपन व संरक्षण करणार आहेत.

वर्तमान निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली ऑगस्ट, २०२१ पासून सुरु करण्यात आलेल्या या नागरी वृक्ष समूह योजनेचा उद्देश हाच आहे की, धरतीवर प्राणवायुचे संतुलन कायम राहावे जो आपल्याला वृक्षांपासून प्राप्त होतो तसेच ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येचा प्रभाव कमी करण्यामध्ये अशा वृक्ष समूहांचे मोठे योगदान होऊ शकेल.  दुसऱ्या बाजुला मानवजातीने यातून अशी प्रेरणा प्राप्त करावी, की विविध प्रकारचे वृक्ष जशा प्रकारे गुण्यागोविंदाने एकत्र वाढतात तद्वत समस्त मानवजातीने भेदभाव विसरुन अनेकतेत एकता व शांतीपूर्ण सह-अस्तित्वाच्या भावनेने वागून या जगाला आणखी सुंदर करावे. 

कोपरखैरणे येथील या ‘वननेस वन’ नागरी वृक्ष समूह उपक्रमाचे उद्घाटन नवी मुंबईचे प्रथम महापौर तथा माजी खासदार डॉ.संजीव नाईक यांच्याहस्ते करण्यात आले. या प्रसंगी ज्ञान विकास संस्थेचे अध्यक्ष ॲङ पी.सी.पाटील, जयश्री पाटील, माजी नगरसेवक केशव म्हात्रे आणि शशिकांत भोईर आदि मान्यवर उपस्थित होते. या व्यतिरिक्त संत निरंकारी मंडळाच्या नवी मुंबई सेक्टरचे संयोजक मनोहर सावंत आणि सेवादल क्षेत्रीय संचालक अरुण पाटील व अशोक केरेकर यांच्यासह मंडळाच्या अनेक शाखांचे मुखी व सेवादल अधिकारी उपस्थित होते. संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशनचे शशी परब आणि अन्य स्वयंसेवकदेखिल उपस्थित होते ज्यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आले.    ,२१ ऑगस्ट रोजी सुरु करण्यात आलेल्या या अभियाना अंतर्गत आतापर्यंत देशभरातील ३५५ ठिकाणी १,५०,००० हून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »