महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
लोकप्रिय बातम्या

जैन समाजाच्या चातुर्मासाच्या पार्श्वभूमीवर साधु-साध्वींना प्रवास करण्याची अटीचे पालन करून परवानगी

प्रतिनिधी .

मुंबई – जैन समाजाचा चातुर्मास सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर साधु-साध्वींना प्रवास करण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. सोशल डिस्टन्सिंग, पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित प्रवास करणार नाहीत आदी अटीनुसार प्रवास करून या साधु-साध्वींना चातुर्मासस्थळी पोहोचण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. जैन समाजाचा चातुर्मास पर्व जुलै महिन्यात प्रारंभ होत आहे. या काळात जैन साधु-साध्वी निश्चित केलेल्या चातुर्मास स्थळी पोहोचण्यासाठी पायी प्रवास करतात. काही वृद्ध साधु-साध्वी व्हील चेअरने प्रवास करून सेवक वर्गासह चार्तुमास स्थळी पोहोचतात.

सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे अनेक भागातून साधू-साध्वी प्रवास करू शकत नाहीत. मात्र चातुर्मास सुरू होण्यापूर्वी त्यांना त्यांच्या निर्धारित स्थळी पोहोचण्यासाठी काही अटींच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे.

पायी प्रवासादरम्यान गर्दी होणार नाही, पाचपेक्षा जास्त जण एकत्रित प्रवास करणार नाही, जेथे मुक्काम आहे त्याठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घेणे, कोरोना संदर्भात केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे, प्रवासादरम्यान दोन व्यक्तींमध्ये पुरेसे अंतर ठेवणे, मास्कचा वापर करणे याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत.

साधू-साध्वींच्या प्रवासादरम्यान व मुक्कामाच्या ठिकाणी त्यांची सुरक्षितता तसेच कायदा व सुव्यवस्था राखली जाईल याची दक्षता जिल्हा व पोलिस प्रशासनाने घेण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. यासंदर्भात आपत्ती विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी सर्व पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवले आहे.

Related Posts
Translate »