महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय व्हिडिओ

लोकांनी राज्यकर्त्यांना वठणीवर आणले पाहिजे अन्यथा राजकारणाचा आणखी चिखल होणार – राज ठाकरे

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

https://youtu.be/BYUengTrjy4?si=lhTr4SBAbhYEDzcc

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवलीत काल पासून यांचा दौरा सुरू आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या पदधिकाऱ्यांच्या बैठकी घेतल्या त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कल्याण डोंबिवली केलेल्या दौऱ्याबाबत बोलताना राज ठाकरे यांनी सध्या लोकसभा मतदारसंघांची चाचपणी सुरू आहे, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत असल्याचे सांगितले. यावेळी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत राज्यकर्त्यांचा समाचार घेतला. ते म्हणाले की, एका कार्यक्रमात गेलो तेव्हा समोर बसलेले आमदार कोणत्या पक्षात आहेत हेच कळत नव्हतं, अशा प्रकारचं वातावरण कधी पाहिलं नाही, लोकांनी यांना वठणीवर आणले पाहिजे. जोपर्यंत लोक वठणीवर आणत नाही तोपर्यंत राज्यकर्त्यांना आपण करतोय ते योग्यच असंच वाटणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणखी चिखल होणार. आपण आज म्हणून बघतोय, अनेक तरुण राजकारणात येऊ इच्छितात मात्र त्यांच्यासमोरच राजकारण सुरू आहे. ते पाहून तरुण वर्ग राजकारणात येणार नाही, या गोष्टीचा निर्णय जनतेने घेणे गरजेचे आहे,अन्यथा महाराष्ट्राच काही खरं नाही.

महाराष्ट्रातले महापुरुष जातीमध्ये विभागून टाकलेत, आजपर्यंत कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव न घेणारे शरद पवार यांना आज रायगड आठवला, असा टोला राज ठाकरे यांनी शरद पवारांना लगावला आहे. शरद पवार यांच्या पक्षाचे तुतारी या चिन्हाचे अनावरण रायगडावर करण्यात आले यावरून राज ठाकरे यांनी शरद पवारांना लक्ष्य केलं. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी जगभरात बॅलेट पेपरवर मतदान होत असताना आपण वोटिंग मशीन का वापरतोय, असा सवाल केलाय. राज ठाकरे हे दोन दिवसांपासून कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत. काल कल्याण मधील कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर आज राज ठाकरे यांनी डोंबिवली येथे कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे.

राज्यात सुरू असलेल्या मराठा ओबीसी वादाबाबत बोलताना राज्यातील बेरोजगारी, पाणी समस्या या सगळ्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जातीचे आधार घेतले जातात, महाराष्ट्र सारख्या श्रीमंत राज्यात अशा प्रकारचे वाद सुरू असतील तर हे वाद कोणीतरी घडवतोय असाही आरोप त्यांनी यावेळी केला.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याबाबतची मागणी अद्याप पूर्ण झालेले नाही. याबाबत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यकर्त्यांना याबाबत काही देणं घेणं नाही तर राज्यात राज्यातले पक्ष सत्तेवर आले पाहिजेत, तेच अशा प्रकारचा दबाव टाकू शकतात असे सांगितले.

राज ठाकरे गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणावर बोलताना म्हणाले की, एखादा माणूस पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करण्यासारखी टोकाची भूमिका घेतो. त्या माणसाची मानसिक स्थिती काय असेल याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

यावेळी आमदार राजू पाटील, मनसे नेते अविनाश अभ्यंकर, अविनाश जाधव, अभिजीत पानसे, प्रकाश भोईर, राहुल कामत यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिक्षकांना निवडणूक कामे देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा विरोध केला. यावेळी राज ठाकरे यांनी निवडणूक आयोग पाच वर्षे काय काम करते निवडणुक आयोगाला यंत्रणा पाच वर्षात उभी करता येत नाही का? शिक्षकांनी मुलांना शिकवायचं सोडून ही काम करायचं का? असा सवाल करत शाळा संपल्यावर शिक्षकांना निवडणूकीच्या कामाला लावणार असा काही निर्णय घेतलाय हे करून तर बघा असा इशारा राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिला आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »