महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी ठाणे

अन्यथा २७ गाव आणि पलावा मधील नागरिक कर भरणार नाहीत – आमदार राजू पाटिल

नेशन न्यूज मराठी टिम.

कल्याण ग्रामीण/संघर्ष गांगुर्डे– कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांमध्ये नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कर आकारणी केडीएमसी कडून करण्यात येत आहे. तर केडीएमसी क्षेत्रातील पलावा सिटीत देखील नागरिकांना कर आकारणीत कोणत्याही प्रकारची सवलत अद्याप केडीएमसी कडून जाहीर झालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी २७ गावांसाठी समिती गठीत करण्याचे आदेश दिले होते. तर पलावा मधील नागरिकांना ६६% कर सवलत देण्याचे आदेश दिले होते . मात्र प्रत्यक्षात ते न झाल्यास नागरिक कर भरणार नाहीत अशी भूमिका मनसे आमदार राजू पाटील यांनी स्पष्ट केली आहे. 

कल्याण डोंबिवली महापालिकेने पलावा सिटी मधील सदनिका धारकांना कर सवलत नियमानुसार देण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली होती. तर २७ गावातील नागरिकांकडून देखील दहापट कर आकरणीला २७ गाव संघर्ष समिती आणि आमदार राजू पाटील यांनी विरोध केला होता. मात्र या नंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली २ मे २०२३ रोजी झालेल्या बैठकीत केडीएमसी क्षेत्रातील २७ गावातील नागरिकांकडून आकारण्यात येणाऱ्या दहा पट कर आकारणी संदर्भात समिती नेमून पुनरमूल्यांकन करून तसेच पलावा मेगासिटी मधील सदनिका धारकांना नियमाप्रमाणे ६६% सवलत देण्याचे मान्य करण्यात आले होते. त्यानुसार केडीएमसीने कर आकारणी करून बील पाठवावीत जेणेकरून केडीएमसीने जाहीर केलेल्या अभय योजनेचा नागरिकांना फायदा होईल व पालिकेचा थकीत कर देखील वसूल होईल. परंतु तसे न झाल्यास २७ गाव आणि पलावा मधील नागरिक कर भरणार नाहीत अशी स्पष्ट भूमिका मनसे आमदार राजू पाटील यांनी मांडली आहे. 

कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांनी घाईघाईत निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन देखील अध्याप २७ गावातील नागरिकांना कर आकरणीत सवलत देण्यासाठी समिती गठीत करण्यात आल्याचे जाहीर केले नाही.तर पलावा मेगा सिटी मधील नागरिकांना कर आकारणीर सवलत दिलेली नाही.त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश देखील केडीएमसी आयुक्तांनी पाळले नसल्याचे यावरून दिसून येत आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »