महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
आरोग्य चर्चेची बातमी

आता कल्याणात जागतिक दर्जाचे उपचार, इंडीयन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर ठरतय रुग्णांसाठी संजीवनी

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

कल्याण/प्रतिनिधी – कॅन्सर म्हणजेच अर्थात कर्करोग. आजच्या घडीला तरुणांपासून ते वयोवृध्द लोकांपर्यंत अनेक जण या आजाराला बळी पडत आहेत. अशावेळी कल्याणातील इंडीयन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर (आयसीटीसी) हे कॅन्सरग्रस्तांसाठी एक आशेचा किरण ठरत आहे. गेल्या 4 महिन्यांच्या कालावधीत कॅन्सरमुळे गंभीर झालेल्या तिघा रुग्णांना जीवदान देण्यात इथल्या डॉक्टरांना यश आले आहे.

आजच्या काळामध्ये डायबेटिसनंतर लोकांमध्ये कोणता आजार मोठ्या प्रमाणात पसरत असेल तर तो कॅन्सर. अगदी 26 वर्षाच्या तरुणापासून ते 80 वर्षांच्या वृद्ध नागरिकांपर्यंत सर्वानाच या कॅन्सरचा विळखा पडत चालला आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत कल्याण शहरात कॅन्सर रुग्णांसाठी कोणतेही उपचार केंद्र किंवा रुग्णालय अस्तित्वात नव्हते. त्यामुळे बहुतांश लोकांना मुंबईतील मोठमोठ्या रुग्णालयांची वाट धरावी लागायची. ज्यामध्ये जाण्या येण्यामध्ये रुग्णाला तर मोठा त्रास व्हायचाच. मात्र त्याचसोबत त्याचे नातेवाईक आणि कुटुंबीयांची आर्थिक, मानसिकदृष्ट्या अधिकच फरफट व्हायची.

या पार्श्वभूमीवर सुप्रसिद्ध कॅन्सरतज्ञ डॉ. अमित घाणेकर यांच्या पुढाकाराने कल्याण पश्चिमेच्या बैल बाजार परीसरात सुरू झालेलं इंडीयन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटरमध्ये (आयसीटीसी) हे एक आशेचा किरण ठरताना दिसत आहे. ग्लोबल स्टँडर्ड उपचार पद्धती, रुग्णामध्ये पसरलेले कॅन्सरचे प्रमाण आणि त्यादृष्टीने परिणामकारक केले जाणार उपचार या त्रिसुत्रीच्या बळावर याठिकाणी रुग्णांमध्ये सकारात्मक परिणाम दिसत असल्याची माहिती आयसीटीसीचे मुख्य डॉ. अमित घाणेकर यांनी दिली. ज्यामुळे गेल्या काही महिन्यांत अतिशय गंभीर अवस्थेत आलेले तीन रुग्ण आज मृत्यूच्या दाढेतून बाहेर आले आहेत. सुरुवातीला या रुग्णांना याठिकाणी स्ट्रेचरवर आणले गेले होते, तेच रुग्ण आता स्वतःहून चालत याठिकाणी पुढील उपचारासाठी येत असल्याचेही डॉ. घाणेकर यांनी सांगितले.

कॅन्सरचे निदान झाल्यानंतर पाठ दाखवून पळण्यापेक्षा त्याला सामोरे जाऊन योग्य पद्धतीने लढण्यातच शहाणपण आहे. या ट्रीटमेंट पद्धतीमध्ये ड्रग्ज, डोस आणि त्याची वेळ हे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी कॅन्सरचे निदान झाल्यानंतर कर्करोग तज्ञाशी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहनही आयसीटीसीचे प्रमूख डॉ. अमित घाणेकर यांनी केले आहे.

किमो थेरपीचे नाव ऐकून घाबरून जाण्यापेक्षा आपल्या ट्रीटमेंटमध्ये कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत याची सविस्तर माहिती घेऊन योग्य ते निर्णय करणे ही काळाची गरज बनली आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »