महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे ताज्या घडामोडी

आता केडीएमसीचा दर सोमवारी जनता दरबार

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – नागरिकांच्या तक्रारी, निवेदने यांच्या निपटारा विशिष्ट कालावधीत व जलदगतीने होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या कार्यलयीन कामकाजात गतिमानता व पारदर्शकता आणण्यासाठी तसेच जनतेच्या तक्रारी समजून घेणे, त्यांच्या अडीअडचणी दूर करुन घेणे, नागरिकांना विविध कल्याणकारी योजनांची माहिती स्थानिक स्तरावर देणे आवश्यक आहे.  त

याकरिता नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्याकरिता आठवडयाच्या प्रत्येक सोमवारी दु. 3 ते 5  या कालावधीत परिमंडळ 1 व 2 च्या उपायुक्तांनी त्यांच्या अधिपत्याखालील मध्यवर्ती प्रभागक्षेत्र कार्यालयात “जनता दरबार” आयोजित करण्याबाबत कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी निर्णय घेतला आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी सदर जनता दरबार कल्याण मध्ये ब प्रभाग क्षेत्र कार्यालयात आणि डोंबिवली मध्ये , डोंबिवली रेल्वे स्थानकानजीकच्या महानगरपालिकेच्या जुन्या विभागीय कार्यालयात उद्या दुपारी 3.00 ते 5.00 या वेळेत संपन्न होणार आहे.

या जनता दरबारात कर्मचारी सेवा विषयक बाबी तसेच नागरिकांच्या सर्व तक्रारी घेणे बंधनकारक राहील. संबंधित परिमंडळातील सर्व संबंधित सहा.आयुक्त व इतर तांत्रिक अधिकारी व कर्मचारी यांनी देखील या वेळी हजर राहणे बंधनकारक राहील. संबंधित विभागीय उपआयुक्त यांच्याकडे तक्रारी/समस्या प्राप्त झाल्यावर त्यापुढील 15 दिवसात त्याचे निराकरण करुन नागरिक/कर्मचारी यांना उत्तर द्यावे असे निर्देश आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी एका परिपत्रकान्वये निर्गमित  केले आहेत.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »