महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

काँग्रेसवर आता कोणाचाही कंट्रोल राहिलेला नाहीये – केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची टीका

नेशन न्युज मराठी टिम.

कल्याण/प्रतिनिधी– अध्यक्ष निवडणे हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र त्यांच्याकडे सध्या निर्माण झालेली ही परिस्थिती पाहता काँग्रेसवर आता कोणाचाही कंट्रोल राहिलेला नाहीये अशी मिश्किल टीका केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याणात केली. कल्याण पश्चिमेतील मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्या नवरात्रौत्सव कार्यक्रमाला भेट दिली. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी ही मिश्किल टीका केली. 

अध्यक्षपद निवडणे हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र भाजप अध्यक्ष निवडताना कधीही कोणत्याही प्रकारचा वाद होत नाही असे. सांगत काँग्रेसमध्ये अशी परंपरा होती की पूर्वी गांधी घराणे हे सांगेल ते होणार. परंतु आता अशी परिस्थिती राहिलेली नाही, ज्याला अध्यक्ष करायचे होते त्यांनी अध्यक्षपद फॉर्म भरण्याची तारीख ,भूमिकाही जाहीर केली आणि मुख्यमंत्रीपद सोडायला लागू नये म्हणून वेगळी चालही केली. त्यावरून काँग्रेसवर आता कोणाचाच कंट्रोल राहिलेला नसल्याचे केंद्रीय मंत्री कपिल पती? यांनी सांगितले. तर दररोज वेगवेगळी नावे आपल्याला बघायला मिळत आहेत. इकडे भारत जोडो आंदोलन सुरू आहे आणि तिकडे काँग्रेस तुटायला लागली आहे. भारत जोडायचा की काँग्रेस जोडायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकल्याचेही पाटील यांनी सांगितले. 

तसेच भारत जोडो अभियान ते राबवत आहेत. मात्र भारताला कोणी तोडले आहे? असा सवाल उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत अखंड आहे. यापूर्वी पाचशे वर्षांपूर्वी जो भारत होता तो अखंड भारत करण्याचे काम आपण करत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. काँग्रेसने भारताचे विभाजन केले असून भारत जोडो करण्याआधी त्यांनी पाकिस्तानला भारताला जोडले पाहिजे होते. लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी आता काँग्रेसची काय परिस्थिती झालेली आहे हे जनतेला माहिती आहे. मोदींना आव्हान देण्यासाठी लढवत असलेल्या शक्कल आता त्यांच्यावरच उलटू लागल्याचा घणाघातही त्यांनी यावेळी केला.

यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार नरेंद्र पवार, नगरसेवक वरुण पाटील, शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, दया गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »