महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image लोकल बातम्या

ब्रह्मज्ञानामुळे आलेली स्थिरता ही जीवनात मुक्तीमार्गाला प्रशस्त करते -निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीने जीवनामध्ये वास्तविक भक्तिचा प्रारंभ होतो आणि त्याच्या स्थिरतेने आपले जीवन भक्तिमय व आनंदीत होऊन जाते असे उद्गार सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी ग्राउंड नं.8, निरंकारी चौक, बुराड़ी रोड (दिल्ली) येथे नववर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष सत्संग समारोह प्रसंगी उपस्थित समस्त भक्तगणांना संबोधित करताना व्यक्त केले. या कार्यक्रमाचा दिल्ली तसेच एन.सी.आर. सह अन्य ठिकाणाहून देखील हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून भाविक-भक्तगणांनी लाभ घेतला तसेच नववर्षाच्या पहिल्याच दिवशी साकार रुपातील सद्गुरुच्या दिव्य दर्शनाचा व अमृतवचनांचा आनंद घेऊन स्वत:ला कृतार्थ केले.

 सद्गुरु माताजींनी ब्रह्मज्ञानाचे महत्व अधोरेखित करताना सांगितले की, ब्रह्मज्ञानाचा अर्थ क्षणोक्षणी परमात्मारूपी दिव्य प्रकाशात विचरण करणे होय. ही अवस्था आपल्या जीवनात तेव्हा येते जेव्हा यावरील दृढता नित्य टिकून राहिल आणि तेव्हाच खऱ्याअर्थाने मुक्ती प्राप्त होईल. याउलट जर आपण मायेच्या अधीन राहिलो तर आनंदाची अवस्था आणि मुक्ती प्राप्त करणे अशक्य होईल हे निश्चित होय.

मायेच्या प्रभावापासुन स्वत:ला बचाव करुन जीवनाचा खरा उद्देश परमात्मा प्राप्ती आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याला जाणून घेण्यासाठी प्रयत्नशिल राहिले पाहीजे. या जगामध्ये निरंकार ईश्वर आणि माया या दोहोंचा प्रभाव कायम असतो. यास्तव आपल्याला निरंकाराशी संलग्न राहून भक्ति केली पाहिजे. आपल्या जीवनात सेवा, सुमिरण, सत्संगला केवळ एक क्रियाकर्म किंवा हजेरीसाठी नव्हे तर निरंकार प्रभूशी वास्तविक रूपात एकरूप होऊन स्वत:चे कल्याण करायचे आहे. 

 मुक्तीच्या मार्गाचा उल्लेख करुन सद्गुरु माताजींनी सांगितले की, ज्यांनी खऱ्या अर्थाने ब्रह्मज्ञानाची दिव्यता समजून घेतली आणि त्याचा आपल्या जीवनात अंगीकार केला अशा संतांनाच मुक्ती मिळते. जीवनाचे महत्व आणि मोल तेव्हाच होते जेव्हा ते वास्तवात जगले जाते केवळ दिखाव्यासाठी नाही. आपण सर्व नित्य निरंतर क्षणोक्षणी या निरंकार प्रभूशी जोडून राहणे हीच खरी भक्ती होय.

 शेवटी सद्गुरु माताजींनी सर्वांसाठी हीच प्रार्थना केली, की आपण सर्वांनी आपल्या उत्तम आचरणाने आणि भक्तीमय जीवनाने अवघ्या जगाला प्रभावित करत सुखद आणि आनंदाने परिपूर्ण जीवन जगावे. निरंकाराचा आधार घेऊन सर्व संतांचे जीवन मंगलमय व आनंदमय होवो.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »