महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी देश

‘राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार ’ नव्या स्वरूपात

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी दिल्ली / प्रतिनिधी – भारत सरकारने विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषी कल्पना या क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कारांना नवे स्वरूप दिले आहे. या प्रतिष्ठित पुरस्कारांना “राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार” म्हणून ओळखले जाते. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार (आरव्‍हीपी)चे उद्दिष्ट शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि नवसंशोधकांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभिनव प्रयोग या क्षेत्रात तसेच नवोन्मेषाच्या विविध क्षेत्रात वैयक्तिकरित्या किंवा समूहामध्‍ये केलेल्या उल्लेखनीय आणि प्रेरणादायी योगदानाला गौरविणे आहे.

राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार हा भारतातील विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. सरकारी, खाजगी क्षेत्रातील संस्था किंवा कोणत्याही संस्थेबाहेर काम करणारे शास्त्रज्ञ/तंत्रज्ञानी /नवशोधक, ज्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान किंवा तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाखालील नवीन उपक्रम राबवले असतील. तसेच कोणत्याही क्षेत्रात पथदर्शक संशोधन किंवा नवकल्पना किंवा शोध या बाबतीत विशेष योगदान दिलेले असेल, ते या  पुरस्कारांसाठी पात्र असतात. भारतीय वंशाच्या लोकांनी परदेशात राहून अमूल्य योगदान दिले असेल आणि भारतीय समुदाय किंवा समाजाला लाभ देणारे कार्य केले असेल तर अशा व्य‍क्तीही  या  पुरस्कारासाठी पात्र ठरतात.

खालील चार श्रेणींमध्ये आरव्‍हीपी पुरस्कार दिले जाणार आहेत:-
अ – विज्ञानरत्न(व्ही आर ) पुरस्काराने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रात केलेल्या आजीवन कामगिरी आणि योगदानाची दखल घेतली जाईल.
ब-  विज्ञान श्री (व्‍हीएस) पुरस्काराने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रात विशिष्ट योगदान देणा-यांना दिला  जाईल.
क- विज्ञान युवा-शांती स्वरूप भटनागर (व्‍हीवाय-एसएसबी) पुरस्कार 45 वर्षे वयापर्यंतच्या तरुण शास्त्रज्ञांना मान्यता आणि प्रोत्साहन देण्‍यसाठी आहे. ज्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रात अमूल्य योगदान दिले आहे.
ड- विज्ञान संघ (व्‍हीटी) पुरस्कार तीन किंवा अधिक शास्त्रज्ञ/संशोधक/नवीन संशोधकांचा समावेश असलेल्या संघाला देण्यात येईल. ज्या समूहाने  विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रात कार्य करून  अतुलनीय  योगदान दिले आहे.
या पुरस्‍कारांसाठी परदेशात कार्यरत असलेल्या भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि नवोन्मेषक, भारतीय समुदायांना किंवा समाजाला मोठ्या प्रमाणावर लाभ देणारे अमूल्य  योगदान देणारेही पात्र असतील.

राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जैविक विज्ञान, गणित आणि संगणक विज्ञान, पृथ्वी विज्ञान, वैद्यक शास्त्र , अभियांत्रिकी विज्ञान, कृषी विज्ञान, पर्यावरण विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषी उपक्रम , अणुऊर्जा, अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान या 13 क्षेत्रांमध्ये दिला जाईल. पुरस्कारासाठी विचार करताना लिंग समानतेसह प्रत्येक डोमेन/फील्डचे प्रतिनिधित्व सुनिश्चित केले जाईल.

राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांसाठी प्राप्त सर्व नामांकने भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार (पीएसए) यांच्या अध्यक्षतेखालील आणि विज्ञान विभागांचे सचिव, विज्ञान आणि अभियांत्रिकी अकादमींचे सदस्य आणि राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार समितीच्या सदस्यांसमोर(आरव्‍हीपीसी) ठेवण्यात येतील. तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विविध क्षेत्रातील काही प्रतिष्ठित शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांचाही या पुरस्कार निवड समितीमध्‍ये समावेश असेल.

या पुरस्कारासाठी नामांकने दरवर्षी 14 जानेवारी रोजी मागविली जातील. दरवर्षी 28 फेब्रुवारी (राष्ट्रीय विज्ञान दिन) पर्यंत नामांकन पाठवण्‍यासाठी मुभा असेल.  या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी 11 मे रोजी (राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन) केली जाईल. 23 ऑगस्ट रोजी(राष्ट्रीय अंतराळ दिन) सर्व श्रेणीतील पुरस्कारांच्या वितरणाचा  समारंभ आयोजित केला जाईल. सर्व पुरस्कारांमध्ये विजेत्यांना सनद आणि पदक प्रदान करण्‍यात येईल.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »