महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

दाढीवाले बाबांच्या कार्यक्रम ठरलेला निर्धार मेळाव्यात नाना पटोलेचे टिकास्त्र

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/प्रतिनिधी – राज्यभर निवडणुकीचे वारे वाहताना सध्या दिसत आहे. प्रत्येक पक्ष हा बैठका.सभा कार्यकर्ते मेळावे घेताना दिसत आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने आपली कंबर चागलीच कसलेली दिसली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण मध्ये काँग्रेसचा विराट निर्धार मोर्च्या आचार्य अत्रे नाट्यमंदिर येथे पार पडला.या मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या आक्रमक विरोधाकानंचा खरपूस समाचार घेतला

गेल्या काही आठवड्यांचा विचार केला तर महाराष्ट्रात विविध ठिकाणी एकापाठोपाठ एक सामाजिक तणाव निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यांचा एकत्रित विचार केला असता, त्या घडवून आणल्या जात असून मणीपूरसारखी अशांतता महाराष्ट्रात पसरवण्याचा हा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप पटोले यांनी यावेळी केले.कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात झालेल्या काँग्रेसच्या विराट निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींवर नाव न घेता सडकून टीका केली.


देशात निर्माण झालेले महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा आदी प्रश्नावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी आपल्याला भांडवले जात आहे. कर्नाटकमधील विजयाने लोकांच्या मनात हा विश्वास निर्माण केला आहे की काँग्रेसच महागाई कमी करू शकते, काँग्रेसच गरिबांना न्याय देऊ शकते. त्यामुळेच तर सर्व जाती धर्मातील सर्वाधिक मते काँग्रेसला मिळाल्याचे पटोले यांनी यावेळी सांगितले.ज्याप्रमाणे आज मणीपूर जातीय दंगलींमध्ये जळत आहे. तशीच परिस्थिती महाराष्ट्रातही करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर केला.

तर या देशामधील लोकशाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान टिकवायचे असेल तर देशामध्ये काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाहीये. तर भाजपला देशातील जनतेशी काहीही देणे घेणे नसल्याचेच त्यांच्या निती आणि धोरणांवरून दिसून येत आहे. भारताला जगामध्ये बलशाली बनवण्याचे काम काँग्रेस पक्षाने केलं असून आम्हीच निर्माण केलेल्या मालमत्ता विकून मोदी सरकार देशाला खड्ड्यात घालत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केल


तर देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर केडीएमसीसाठी ६ हजार ५०० कोटींचे आश्वासन दिले होते. त्याचे पुढे काय झाले? एकही पैसा कल्याण डोंबिवलीत खर्च केला नाही. इथल्या सत्तेच्या माध्यमातून त्यांनी हा पैसा लुटण्याचेच काम केल्याची टीकाही पटोले यांनी केली.

राज्यातील शेतकरी, बेरोजगार, तरुण पिढी असे सर्वच जण नाना पटोले यांच्याकडे आशेने पाहात आहेत. त्यामुळे ते या राज्याचे मुख्यमंत्री पद अतिशय समर्थपणे सांभाळू शकतील असा विश्वास यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच कल्याण डोंबिवली शहरांच्या मागासलेपणाला भाजप आणि शिवसेना जबाबदार असल्याचे सांगत आपल्या भाषणात त्यांच्यावर जोरदार टीका केली.

यावेळी युवक काँगेस सरचिटणीस ब्रीज दत्त, महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी, ब्लॉक अध्यक्ष विमल ठक्कर, प्रदेश सदस्य मुन्ना तिवारी यांच्यासह अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान आचार्य अत्रे रंगमंदिरात झालेल्या या निर्धार मेळाव्याला लोकांची तुडूंब गर्दी झाली होती.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »