महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image इतर

मनसे आमदार राजू पाटील यांचा वतीने घरकाम करणाऱ्या महिलांना अन्नधान्याचे वाटप

    प्रतिनिधी.

    डोंबिवली – देश लॉकडाऊन झाल्यापासून आपल्या विविध सामाजिक कार्याने चर्चेत असलेले मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या कामाचा धडाका सुरूच ठेवला आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी अन्नधान्य, कोरोना योध्यांसाठी आरोग्य साहित्य तसेच विविध विषयावर आवाज उठवत पत्रव्यवहार,पाठपुरावा ते करत आहेत. त्याच्या पाठपुराव्याला काही प्रमाणात यश सुद्धा आले आहे.

    मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एक सक्षम विरोधी पक्षासाठी मतदारांकडे मत मागितली होती. मात्र संपूर्ण महाराष्ट्रात मनसेचा एकमेव आमदार म्हणून कल्याण ग्रामीण विधानसभेतून प्रमोद(राजू)पाटील हे निवडून आले आहेत.मात्र निवडून आल्या पासून मनसे आमदार हे नागरिकांच्या समस्या आणि प्रश्न सोडवण्यात व्यस्त आहेत. संकटात नागरिकांना येणाऱ्या अडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी आमदार पाटील हे नेहमीच पुढाकार घेत आले. गेल्या ४ महिन्यापासून कोविड-१९ (कोरोना) ह्या रोगाने थैमान घातले आहे. अनेक जणांवर उपासमारीची वेळ आली.मात्र आमदार पाटील यांनी लोकांना वेळोवेळी जमेल ती मदत केली.त्यासाठी त्यांनी कधीच आपला हात हा आखडता घेतला नाही म्हणूनच ज्या महिलांना गेले ४ महिने हाताला काहीच काम नाही अशा घरकाम करणाऱ्या महिलांची अडचण समजुन त्यांच्यासाठी त्यांनी अन्नधान्याचे किट देणाचे ठरविले आणि पुढे त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकता प्रतिष्ठान-पलावा यांचा सहकार्याने ज्यांच्याकडे ह्या महिला काम करत आहेत त्याच्याकडून ती नावे नोंदणीकृत करून घेण्यात आली आणि नंतर सोशल डिस्टन्सचे नियम पाळून अन्नधान्य वाटण्यास सुरवात केली आहे. नावे नोंदणी केलेल्या अश्या सहाशे पेक्षा जास्त महिलांना अन्नधान्य किट वापट करण्यात आले असे एकता प्रतिष्ठान-पलावा यांच्याकडून सांगण्यात आले.

    Related Posts
      Translate »