महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी ठाणे

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे टोरंट कंपनी विरोधात आ. राजू पाटील यांची हरकत दाखल

नेशन न्युज मराठी टिम.

कल्याण/ प्रतिनिधी – भिवंडी आणि शीळ परिसरात वीजपुरवठा करणाऱ्या टोरंट कंपनीच्या कार्यपद्धतीवर नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यातच टोरंट कंपनीने ठाणे आणि पालघर जिल्ह्यात वीजपुरवठा करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. यावर प्रशासनाने हरकती सादर करण्याचं आवाहन केलं होत. यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे आपली हरकरत नोंदवली आहे. 

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी आणि शीळ परिसरात वीजपुरवठा करणाऱ्या टोरंट या खासगी कंपनीने दोन जिल्ह्यात वीजपुरवठा करण्याचा प्रस्ताव शासनानला दिला आहे. टोरंट च्या या प्रस्तावाला शासनाने देखील मंजुरी देण्याआधी नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. त्यानुसार मनसे आमदार राजू पाटील यांनी आपली हरकत नोंदवली आहे. टोरंट कंपनीला परवानगी दिल्यास कृषी क्षेत्राला फटका बसणार आहे.त्याच प्रमाणे सध्या वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीला राज्यातून जेवढे महसूल मिळतो त्यातील सर्वसाधारण ६० ते ७० टक्के हा मुंबई,भांडुप,कल्याण,पुणे विभागा प्राप्त होत आहे.परंतु टोरंट कंपनी या परिसरात वीजपुरवठा करण्यास उत्सुक असल्याने आणि परवानगी दिल्यास मावितरणही संपूर्ण यंत्रणा कोलमडेल व शेतकऱ्यांना मिळणारी सवलत देखील मिळणार नाही.

या परिसरात महावितरण कडून वीज वितरणासाठी महावितरणने हजारो कोटी रुपये खर्च केले आहेत. हे सर्व खर्च सर्व सामान्य जनतेच्या पैशातून केलेलं आहे. त्यामुळे महावितरणने तयार केलेल्या पायाभूत सुविधा अगदी नगण्य दारात खासगी कंपनीला देण्यास मनसे आमदार राजू पाटील यांनी विरोध केला आहे. महावितरण हि शासकीय कंपनी विजेचे युनिट दर ठरवताना सामाजिक बांधीलकी देखील जपते. मात्र स्वतःच्या फायद्यासाठी आलेली खासगी कंपनी आपली तिजोरी भरण्यासाठी परवानगी मागत आहे. अस आमदार याचं म्हणणे आहे.

तर राज्यभरात महावितरण आणि वीजनिर्मिती आणि महरेषा या शासकीय कंपन्यांचे ८५००० कर्मचारी आहेत. भविष्यात या खाजगी कंपनीला प्रवेश दिल्यास हे सर्व कर्मचारी बेरोजगार होणार आहेत. त्यामुळे या कंपनीला देण्यात येणार परवाना रद्द करण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. 

टोरंट कंपनीचा वाढता प्रवेश आणि त्यातच नागरिकांचा संताप या कंपनीवर सर्वाधिक आहे. त्यामुळे सद्य परिस्थितीत महावितरण आणि शासकीय कंपन्यांकडून सुरू असलेला वीजपुरवठा सुरळीत ठेवणे गरजेचे आहे. भविष्यात शासनाने खाजगी कंपनीला परवाना दिल्यास जण आंदोलन उभं राहण्याची  शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने देखील योग्य निर्णय घेणं गरजेचं झालं आहे. त्यामुळे आता शासन काय निर्णय घेतंय हे पाहन महत्त्वाचं ठरणार आहे.        

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »