महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे ताज्या घडामोडी

गोदरेज हिल,बारावे येथील केडीएमटी बस सहा महिन्यांपासून बंद,बससेवा सुरु करण्याची जेष्ठ नागरिकांचे मागणी

कल्याण/प्रतिनिधी – नवीन कल्याण म्हणून ओळख असलेल्या खडकपाड्याच्या पुढील गोदरेज हिल बारावे याठिकाणी सुरु असलेली केडीएमटीची बससेवा गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. हि बससेवा बंद असल्याने येथील नागरिकांना प्रवासासाठी मोठी कसरत करावी लागत असून रिक्षाला जास्त भाडे देऊन रोज ये जा करावी लागत आहे. यासाठी येथील बससेवा पुन्हा सुरु करण्याची मागणी येथील जेष्ठनागरिकांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

कल्याण पश्चिमेतील गोदरेज हिल बारावे परिसरात सुमारे १५ ते २० हजार लोकसंख्या असून २ हजार लोकं नोकरी निमित्त रोज स्टेशनला ये जा करतात. येथील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने याठिकाणी बससेवा सुरु केली होती. हि बससेवा गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. यामुळे येथील नागरिकांना खाजगी बस अथवा रिक्षाचा आधार घ्यावा लागत आहे. खाजगी बस स्टेशनपर्यंत २० रुपये तर रिक्षाला प्रती व्यक्ती ४० रुपये अथवा डायरेक्ट रिक्षा केल्यास १०० रुपये देखील मोजावे लागत आहेत. हेच जर पालिकेची बस सुरु असल्यास नागरिक १० रुपयांत स्टेशनला जातात, तर जेष्ठ नागरिक अवघ्या ५ रुपयांत स्टेशनला जातात. यामुळे केडीएमटीची बससेवा सुरु नसल्याने येथील नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.

 याबाबत येथील जेष्ठ नागरिक वारंवार पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करीत असून संबधित विभागाचे उपायुक्त परिवहन व्यवस्थापकांकडे बोट दाखवतात, तर परिवहन व्यवस्थापक संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे बोट दाखवतात. प्रत्येक जण आपली जवाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याचे येथील जेष्ठ नागरिक आर. बी. शेगोकार यांनी सांगितले.दरम्यान याबाबत परिवहन व्यवस्थापक दिपक सावंत यांना विचारले असता कोरोना काळात लॉकडाऊनमुळे परिवहनचे बहुतांश मार्ग हे बंद होते. आता हळूहळू सर्व मार्ग पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.   

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »