महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

नांदेड जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय नैराश्य संपविने तुमच्या हातात आहे – प्रकाश आंबेडकर

नेशान न्यूज मराठी टीम.

नांदेड – नांदेड जिल्ह्यात प्रस्थापितांच्या विरोधात एक मोठा वर्ग होता त्यांना लोकशाही मार्गाने सोबत घेऊन अनेकदा राजकीय परिवर्तन घडवून आणलं होतं. आंबेडकरवाद्यांची एकतेची मुठ बांधुन ओबीसी मायक्रो ओबीसी यांच्या साथीने इथे भल्याभल्यांना धुळ चारली होती. भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून मोठ मोठ्या उलथापालथी घडवून आणल्या गेल्या. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत नांदेड जिल्हा हा सामाजिक आणि राजकीय प्रयोगाच्या चर्चेचा विषय ठरला होता. परंतु अलीकडच्या काळात येथिल ओबीसी आणि आंबेडकरवादी कार्यकर्ता थोडा थांबला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राजकीय परिवर्तन एका रात्रीत होत नसते.

त्यामुळे राजकीय यश मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. प्रस्थापितांच्या मोहातुन बाहेर पडावेच लागेल. वंचितांची भूमिका घेऊन दिवसरात्र कष्ट करण्याना साथ द्यावी लागेल. वर्षानुवर्षे आम्हीच संघटनेचे मालक आहोत हि वृत्ती सोडावी लागेल. सर्व समाजाला या चळवळीत सन्मानाने सहभागी करून सोबत घ्यावे लागेल. आंबेडकरवाद्यांनी आता पालकांच्या भूमिकेत येणे गरजेचे आहे. अभ्यास पूर्ण माहितीच्या आधारावर आणि संघटनात्मक कौशल्यावर आधारित काम करावे लागेल तेव्हाच यश मिळेल. पहिल्यासारखाच हा जिल्हा परत उभा करून वंचितांना सत्तेत सहभागी करावं आणि आलेलं सामाजिक व राजकीय नैराश्य संपवावे असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एड प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. ते नांदेड मध्ये प्रमुख पदाधिकार्यांच्या बैठकीत बोलत होते.

याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकुर, राज्य प्रवक्ते फारूक अहमद, राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी, राज्य उपाध्यक्ष तथा प्रभारी नागोराव पांचाळ, जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, जिल्हा महासचिव श्याम कांबळे यांच्या सह अनेक जन उपस्थित होते. यावेळी नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा स्वतंत्र आढावा स्वतः आंबेडकर यांनी घेतला. प्रत्येक पदाधिकार्यांच्या अडचणी वैयक्तिक लक्ष घालून समजून घेत उपाययोजना सुचविल्या पक्षाच्या सर्व आघाड्यांवर काम करणाऱ्या पदाधिकार्यांना जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी सुचना दिल्या. या दोन दिवसीय दौऱ्याने नांदेड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या नियोजनबद्ध दौऱ्यात पक्षाचे विभागीय पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष महासचिव तालुकाध्यक्ष महासचिव शहराध्यक्ष महासचिव महिला आघाडीचे पदाधिकारी, सम्यक विद्यार्थी आंदोलनचे पदाधिकारी यांच्या सह महत्वाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »