महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image लोकप्रिय बातम्या विदेश

भारतीय तटरक्षक दलाची शौर्य आणि राजवीर ही जहाजे बांग्लादेशात तैनात

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – भारत आणि बांग्लादेश तटरक्षक दलात(BCG) झालेल्या सामंजस्य कराराच्या (MOU) तरतुदींअंतर्गत परस्पर सहकार्य आणि परस्पर कार्यक्षमता वाढवण्याच्या हेतूने, भारतीय तटरक्षक दलाची जहाजे (ICGS) ‘शौर्य’ आणि ‘राजवीर’ दिनांक 13 ते 19 जानेवारी, 2023 या कालावधीत बांग्लादेशच्या चट्टग्राम, इथे सहा दिवसांच्या भेटीस पाठविण्यात आली होती.

बांगलादेश तटरक्षक दलासोबत भारताचे संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने, ही भेट अत्यंत महत्वाची होती. गेल्या काही वर्षात, बांगलादेश तटरक्षक दलाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली असून, या प्रदेशाची सुरक्षितता आणि सागरी सुरक्षा व स्वच्छता अबाधित राखण्यासाठी, ही भेट उपयुक्त ठरेल. या भेटीदरम्यान बीसीजी मधील विविध वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचार्‍यांशी झालेल्या फलदायी चर्चामुळे, मच्छिमार आणि नाविकांची  सुरक्षितता आणि संरक्षण करणे अधिक सहजसाध्य झाले आहे.

या भेटीदरम्यान, भारतीय तटरक्षक दलाच्या प्रदूषण प्रतिसाद पथकाने बांगलादेशमध्ये, 20 बीसीजी कर्मचार्‍यांसाठी प्रथमच पाच दिवसांचा आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेचा ‘प्रदूषण प्रतिसाद’ याविषयावरील  प्रशिक्षण अभ्यासक्रम आयोजित केला होता.यावेळी बीसीजी कर्मचार्‍यांना आयसीजीएस  शौर्य आणि राजवीर या जहाजांवर पीआर(PR) उपकरणे चालवण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले.

भेटीच्या शेवटी पर्यावरण संरक्षण तसेच शोध आणि बचाव क्षेत्रातील प्रमाणित कार्यान्वयन पद्धती (SOPs) प्रस्थापित करण्यासाठी बीसीजीच्या जहाजांसह समुद्रात एक संयुक्त सराव आयोजित करण्यात आला. यावेळी वरिष्ठ अधिकारी आणि प्रशिक्षणार्थींनी दाखवलेला उत्साह आणि रुची या प्रदेशातील संबंधित दोन्ही सरकारांच्या सागरी पर्यावरण संरक्षण उपक्रमांना नक्कीच चालना देईल.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »