महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image क्रिडा ताज्या घडामोडी

क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते राजस्थानमध्ये खेलो इंडिया केंद्रांचे उद्‌घाटन

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी दिल्ली / प्रतिनिधी – जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियममध्ये आज सकाळी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी राजस्थान राज्यातील 33 खेलो इंडिया केंद्रांचे उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी राजस्थानमध्ये अतिरिक्त 18 खेलो इंडिया केंद्रांसह समर्पित क्रीडा विज्ञान केंद्र असलेले राष्ट्रीय सर्वोत्कृष्टता केंद्र स्थापन केले जाईल, अशी घोषणा केली, त्यामुळे राज्यातील खेलो इंडिया केंद्रांची एकूण संख्या 51 वर गेली आहे.

कार्यक्रमाला संबोधित करताना अनुराग सिंह ठाकूर म्हणाले, “सर्व राज्यांनी क्रीडा प्रकारात  प्रगती करावी अशी आमची इच्छा आहे. जेव्हा राज्य सरकारे केंद्र सरकारच्या बरोबरीने सामायिक दृष्टिकोनासह क्रीडा क्षेत्रासाठी काम करतील तेव्हा भारताच्या खात्यात आणखी पदके येतील..

“खेलो इंडिया योजना तसेच टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजनेच्या यशामुळे गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावर , मग ते ऑलिम्पिक असो किंवा पॅरालिम्पिक किंवा राष्ट्रकुल स्पर्धा असो किंवा थॉमस चषक  जिंकण्यासारखी ऐतिहासिक स्पर्धा असो, पदकांची संख्या वाढली आहे. अंतीम पंघलनेही दोनदा 20  वर्षांखालील  कुस्ती स्पर्धेची  विश्वविजेता बनून इतिहास रचला. बुद्धिबळातही प्रज्ञानानंदने  फिडे विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली. भारतीय खेळांसाठी हा आश्चर्यकारक  टप्पा आहे. 60 वर्षांत, जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये केवळ 18 पदके होती. या वर्षी आपण स्पर्धेत 26  पदके जिंकली आहेत.”

खेलो इंडियाचे महत्व अधोरेखित करत केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले,” या सर्व यशामध्ये खेलो इंडिया स्पर्धेची मोठी भूमिका आहे. दरवर्षी, अनेक खेळाडू युवा, विद्यापीठ आणि हिवाळी क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतात आणि त्यातील त्यांची कामगिरी त्यांना मोठ्या स्पर्धांकडे घेऊन  जात आहे. मला आशा आहे की या खेलो इंडिया केंद्रांद्वारे, राजस्थानमधील अधिकाधिक खेळाडू इथे तयार होतील. आजी आणि माजी खेळाडूही या केंद्राचा लाभ होत आहे.”
 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »