महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे लोकप्रिय बातम्या

या दोन गावात एकही गावकरी गणपती घरी आणत नाही

कल्याण ग्रामीण –  राज्यात,देशात किवा परदेशात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.सार्वजनिक असो किव्हा घरगुती गणपती सर्व आनंदाने गणेशोत्सव साजरा करतात. बाप्पाची मूर्ती आणून गणेश चतुर्थीला प्रतिप्रतिष्ठापना केली जाते.मात्र कल्याण ग्रामीण भागातील बाळे आणि वडवली गावात गेल्या दीडशे वर्षांपासून गणपतीं बाप्पाची मूर्ती कोणीही घरी आणत नाही आणि प्रतिप्रतिष्ठापना करत नाहीत.हे ऐकून आश्चर्य वाटले असेल ना….

राज्यात,देशात किवा परदेशात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.सार्वजनिक असो किवा घरगुती गणपती सर्व आनंदाने गणेशोत्सव साजरा करतात. बाप्पाची मूर्ती आणून गणेश चतुर्थीला प्रतिष्ठापना केली जाते.मात्र कल्याण ग्रामीण भागातील बाळे आणि वडवली गावात गेल्या दीडशे वर्षांपासून गणपतीं बाप्पाची मूर्ती कोणीही घरी आणत नाही आणि प्रतिष्ठापना करत नाहीत.तसेच सार्वजनिक मंडळ सुद्धा गणपती बसवत नाही.कारण या दोन्ही गावांच्या मध्यस्थानी असलेल्या स्वयंभू गणपती मंदिरामुळे….बाळे आणि वडवली या गावांमध्ये सुमारे साडे तीनशे ते चारशे घरे आहेत. मात्र यापैकी एकाही घरात गणेश चतुर्थीला गणपती आणला जात नाही. याचं कारण म्हणजे या गावांच्या मध्यभागी गणपतीचं मंदिर आहे.या 2 गावातील ग्रामस्थ याच गणपतीचं पूजन करतात. शेकडो वर्षांपासून हे चालत आहे. घरगुती किव्हा सार्वजनिक गणपती ऐवजी गणेशोत्सवा दरम्यान गावातील गणेश मंदिरात सात दिवस उत्सव साजरा केला जातो. यादरम्यान, गावातील मंडळी, तसेच बाहेरगावातून किर्तनकार प्रवचनकार मंडळी मोठ्या संख्येने मंदिरात येत असते. दरवर्षी मोठ्या उत्साहात हरिनामाचा जयघोष या मंदिरात साजरा केला जातो.रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील भाविक या मंदिरात येत असतात.मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याने मंदिरात कोणत्याही कार्यक्रमांचे आयोजन केले गेले नाही…

Related Posts
Translate »