Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image ताज्या घडामोडी महाराष्ट्र

गणेश विसर्जनाच्या उत्साहात, उल्हास नदीत युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू

नेशन न्यूज मराठी टीम.

रायगड / प्रतिनिधी – गणेशोत्सवाच्या उत्साहानंतर होणारे विसर्जन आणि त्या अनुषंगाने घडलेल्या अनेक चांगल्या वाईट घटना पाहायला मिळत आहेत. आनंदात मग्न कार्यकर्त्यांना बऱ्याचदा येणारा प्रसंग जीवावर बेतणार आहे याची कल्पना देखील नसते.रायगड जिल्ह्यात विसर्जनासाठी गेलेल्या युवकांना जलसमाधी मिळाली आहे. त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

रायगडच्या कर्जत तालुक्यातील चांदई येथे उल्हास नदीत गणेश विसर्जनासाठी उतरलेले चार जण बुडाले होते. यापैकी एकाला वाचवण्यात यश आले आहे. तर रेस्क्यू टीमने उरलेल्या तिघांपैकी दोन मृतदेह बाहेर काढले आहेत. उल्हास नदीच्या खोल पात्रात आणि वेगवान प्रवाहात सर्व अत्याधुनिक यंत्रणा वापरून मोठी जोखीम पत्करून रेस्क्यू टीम चे सदस्य शोध मोहीम राबवित आहेत. अद्याप एका मृतदेहाचा शोध युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X