महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image इतर ताज्या घडामोडी

महावितरणाचा मनमानी कारभाराच्या निषेधार्थ, त्रस्त नागरिकांचे टाळ,चिपळ्या आंदोलन

नेशन न्यूज मराठी टीम.

जालना / प्रतिनिधी – गेल्या एक ते दीड महिन्यांपासून जुना जालना भागातील गोकुळ नगरी, वृंदावन कॉलनी, भाग्यनगर सह संपूर्ण जुन्या जालन्यामध्ये वीजपुरवठा अचानक खंडित होत आहे. त्याचा त्रास सामान्य नागरिकांच्या सोबतच विद्यार्थ्यांनाही सोसावा लागत आहे. ज्या वेळेला नळाला पाणी येते त्या वेळेला लाईट राहत नाही आणि ज्या वेळेला लाईट असतात त्यावेळी पाण्याचा वेळ निघून गेलेला असतो. त्यामुळे महिलांना पाणी भरण्यास मोठ्या अडचणी येत आहेत. त्या अनुषंगाने जुना जालना भागातील महिला आणि पुरुषांनी एकत्र येत महावितरणाच्या अभियंतांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले.

यावेळी टाळ चिपळ्यांचा गजर करण्यात आला. आमच्या मागण्यांवर योग्य विचार येणाऱ्या तीन ते चार दिवसात न झाल्यास यापुढे महिला लाटणे घेऊन उभे राहतील असा इशारा यावेळी देण्यात आला. सध्या श्रावण मास चालू असून पहाटे मंदिरात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आणि महिलांची मोठी वर्दळ असते, पहाटे वीज जात असल्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे.

याशिवाय अनेक शासकीय कार्यालय, रुग्णालय, महिला व बाल रुग्णालयातील रुग्णांच्या उपचारावर याचा परिणाम होत आहे. विजेची ही गंभीर समस्या तात्काळ लवकरात लवकर सोडण्याचे एक निवेदन नागरिकांच्या वतीने महावितरणच्या कार्यालयास देण्यात आले आहे. यावेळी महावितरणच्या विरोधात नागरिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली.नागरिकांनी यावेळी या भागातील रस्त्याचाही प्रश्न माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांच्याकडे उपस्थित केला व यावर आवाज उठवण्याची मागणी केली.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »