नेशन न्यूज मराठी टीम.
जळगाव / प्रतिनिधी – रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघाताचे वाढते प्रमाण पाहता दुचाकी चालकांना ह्याचा जास्त त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक शासन व प्रशासन ह्यांनी सामान्य जनतेच्या ह्या रोजच्या प्रवासातीलप्रश्नांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जळगाव शहरातदेखील नादुरुस्त रस्ते तसेच खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
या खड्ड्यांच्या समस्येमुळे महापालिका प्रशासनाच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षातर्फे जळगावतील खड्ड्यांमध्ये झोपा काढो आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते चक्क खड्ड्यांमध्ये झोपले होते. या अनोख्या आंदोलनातून प्रहार जनशक्तीच्या वतीने महापालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधींचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.