महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

गोंदिया जिल्ह्यात हत्तीच्या कळपाचा धुमाकूळ; शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.

गोंदिया/प्रतिनिधी – गोंदिया जिल्ह्यात गडचिरोली जिल्ह्यातून आलेल्या हत्तीच्या कळपाने मोठा धुमाकूळ माजवला असून गोंदिया जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या धान पिकांच्या बरोबरचं अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये हरभरा, तूर, वटाणा, मूग यांसारखे अनेक पीक लावले होते. मात्र, हत्तीचे कळप या ठिकाणातून येत जात असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. याविषयी शेतकऱ्यांनी वन विभागाला तक्रार करुन अद्यापही वन विभागाने पंचनामे केले नाही, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हत्तीच्या कळपाने नासधूस केली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोळदे, राजोली, भरणोली आणि नवेगाव बांध क्षेत्राच्या जंगल परिसराच्या जवळ असलेल्या शेतामध्ये हत्तीच्या कळपाचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. हत्तीच्या कळपाने शेतकऱ्यांनी या भागात लावलेल्या हरभरा, वटाणा, मूग आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले असल्याचे दिसून आले आहे. या क्षेत्रातील शेतकऱ्यांनी वन विभागाने लवकरात लवकर पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे. मात्र, अद्यापही वन विभागाने या परिसरातील हत्तीच्या कळपाने केलेल्या नासाडीची पाहणी सुद्धा केली नसल्याचे दिसून आले आहे.

मागील वर्षी सुद्धा हत्तीच्या कळपाने अर्जुनी मोरगाव क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर नासाडी केली होती. याविषयी त्या क्षेत्राचे आमदार मनोहर चंदिकापुरे यांनी पाहणी करून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले. परिसरातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर कशाप्रकारे नुकसान भरपाई मिळेल याकरिता वनमंत्री यांना यासंबंधित माहिती देऊन लवकरात लवकर पंचनामे करून या शेतकऱ्यांना कशाप्रकारे मोबदला देण्यात येईल, याविषयी प्रश्न उपस्थित करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर भरपाई मिळावी यासाठी शेतकरी वाट पाहत आहेत.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »