महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे ताज्या घडामोडी

अंबरनाथ मध्ये केमिकलच्या टाकीत गुदमरून ३ कामगारांचा जागीच मृत्यू

अंबरनाथ प्रतिनिधी – अंबरनाथ येथील एका कंपनीच्या रासायनिक भूमिगत टाकीत साफसफाईसाठी उतरलेल्या ३ कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हि घटना अंबरनाथ पश्चिम भागातील आयटीआय नजीक असलेल्या ईस्टर केमिकल कंपनीत घडली आहे. हर्षद , दिनेश,आणि बिंदेश असे रासायनिक टाकीत गुदमरून मृत्यू झालेल्या कामगारांचे नाव आहेत.अंबरनाथ पश्चिम भागात ईस्टर केमिकल कंपनी आहे. या कंपनीत भूमिगत गॅसच्या टाक्या असून या टाक्याना आतून रंग लावल्यासाठी मृत कामगांराना ठेकेदाराने सांगून कामाला नेले होते. आज सकाळी साडे आठ च्या सुमारास हे तिन्ही कामगार गॅसच्या टाकीला रंग लावण्यासाठी आदी साफसफाई करिता टाकीत उतरले होते. मात्र त्यांचा टाकीत जागीच गुदमरून मृत्यू झाला. खळबळजनक बाब म्हणजे या गंभीर घटनेची माहिती दुपारी ११ वाजता कंपनी व्यस्थापकाने अग्निशमन दलाच्या कार्यालयात दिल्यानंतर घटनास्थळी अग्निशमनचे जवान दाखल होऊन त्यांनी तिन्ही कामगारांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात रवाना केला आहेत.

घटनस्थळी अंबरनाथ पोलीस दाखल झाली असून पोलिसांनी पंचनामा करून पुढील कारवाई करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान तिन्ही कामगारांना कुठल्याही सुरक्षेची साधने न पुरवता त्यांना गॅसच्या टाकीत साफसफाईसाठी उतरवल्याचा निष्काळजीपणा केल्याचे समोर आले आहे. अधिक तपास अंबरनाथ पोलीस करीत आहेत.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »