नेशन न्यूज मराठी टीम.
अमरावती/प्रतिनिधी – आज प्रचंड महागाईचे चटके सामान्य माणसाला सहन करावे लागत आहेत. गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडलेत, वाढती बेरोजगारी, शेतकरी समस्या, शिक्षणाचा प्रश्न निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत शासनाने योग्य उपाय योजना करुन या सर्व गोष्टीवर नियंत्रण मिळवायला हवे. जर ही परिस्थिती आटोक्यात आली नाही, तर गोरगरीब सामान्य माणसाने जगावे कसे ? हा प्रश्न भेडसावत आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करुन सध्याच्या देशातील व राज्यातील सरकारने योग्य ती पाऊले उचली पाहीजे. या सर्व प्रकारा बद्दल जर न्याय मिळाला नाही तर लोकाच्या भावना लक्षात घेता, वंचित बहुजन आघाडी अंजनगाव सुर्जी व जिल्हाच्यावतीने तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशारा अंजनगाव तहसील कार्यालय येथे निवेदनात देण्यात आला आहे.
या प्रसंगी वंचित बहुजन जिल्हा महिला आघाडी महासचिव गंगा प्रेमानंद इंगळे, जिल्हा सचिव तथा सरपंच विपिन अनोकार, जिल्हा प्रवक्ता रामजी राठोड, चौसाळा सरपंच सुनंदा ताई पाखरे, दहिगाव रेचा सरपंच मंगलाताई मनोहर डोगरे, उपजिल्हा प्रमुख अतुलभाऊ पवार, रुपेश भाऊ वाठ, सुनिल राक्षसकर, पंकज वारुळे, मंगेश शिंदे, अनुरुप बसवंत, प्रेमानंद इंगळे, रोशन इंगोले, पंकज भटकर, अरविंद गांवडे, विकास खंडारे, रमाताई सावळे, उषाताई रायबौले, निर्मला गवई, शुभांगी ताई वानखडे, शोभाताई अढाऊ, अरुणा गावनेर , सरला सावळे, शिलाताई नाईक, निर्मला सावळे, सुशिलाताई राक्षकर, शारदा ताई रामटेके, यशोधरा गवई, पुष्षा खंडारे, कविता मसाने, इदु जामनिक, बेबी ताई राक्षकर, नंदा देविदास वानखेडे, मदां ताई धांडे आशाताई सावळे, कुसुम काळपाडे, आशा ताई पानझाडे, शेषकन्याताई वाकोडे, शितल वाकोडे ह्या सर्व तालुक्यातील पदाधिकारी व महीला पदाधिकारी यांनी निवेदन सादर केल आहे.



