महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
पोलिस टाइम्स मुख्य बातम्या

लाईट बिल भरण्याच्या नावाखाली आजोबांची ऑनलाईन फसवणूक

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

कल्याण/प्रतिनिधी – लोकांची ऑनलाईन फसवणूक करुन पैसे कमवणाऱ्या विविध टोळ्या राज्यासह भारतभर सक्रिय आहेत. या टोळ्या लोकांना बनावट कॉल करुन, मेसेज करुन त्यांची फसवणूक करतात. ऑनलाईन फसवणुकीचे नवनवीन प्रकार या टोळ्या आत्मसात करत असतात. या टोळ्या महिला, लहान मुलं आणि वृद्ध नगरिकांना आपले लक्ष्य बनवतात. कल्याणात राहणाऱ्या ६७ वर्षीय आजोबांना ऑनलाईन गंडा घातला गेला.

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात राहणारे ६७ वर्षीय जयराम जाधव हे त्यांच्या मुली आणि नातीसोबत राहतात. त्यांना रात्री दहा वाजताच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, तुमच्या घराचे लाईट बिल भरले गेले नाही. त्वरीत पैसे भरा नाही तर तुमचा वीज पुरवठा आत्ताच खंडीत केला जाईल घरात लहान मुलगी असल्याने जयराम जाधव हे घाबरले. लाईट नसेल तर अंधारात रात्र कशी काढणार या भिती पोटी जाधव लाईट बिल भरण्यास तयार झाले. त्यानंतर समोरच्या व्यक्तीने प्रथम १०० रुपये पाठविण्यास सांगितले. या दोघांचे संभाषण सुरु असताना २० सेंकदात जयराम जाधव यांच्या खात्यातून १ लाख ४४ हजार रुपये गायब झाले. थोड्या वेळात जयराम यांना समजले की, त्यांची फसवणूक झाली आहे.

या प्रकरणी जयराम जाधव यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी जयराम यांचे खाते पोलिसांनी गोठविले. खाते गोठविले गेल्याने समोरचा व्यक्ती पैसे काढू शकली नाही. पुढील प्रक्रिया करुन जयराम जाधव यांना पोलिसांनी त्यांचे पेसै परत केले. आयुष्याची कमाई चोरी गेली होती. ती पुन्हा मिळाल्याने जयराम जाधव यांनी पोलिसांचे आभार मानले. मात्र आपल्या फोनवर कॉल कुठून येतो? कोण मेसेज करतो? तो काय सांगतो? या भूलथापांना नागरीकांनी बळी पडू नये असे आवाहन वारंवार करुन देखील नागरीक बळी पडतात ही दुर्दैवी बाब आहे. याकडे पोलिसांनी लक्ष वेधले आहे.

Related Posts
Translate »